शांतीलाल गायकवाड, औरंगाबादप्रशासनाच्या आवडत्या गोपनीयतेवरील पडदा हटवून सर्वसामान्य नागरिकांच्या हाती ‘माहिती अधिकाराचे’ शस्त्र भारत सरकारने देऊन उणेपुरे १० वर्षे होत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या सदस्या नंदा ठोंबरे यांना सिंचन विभागातील माहिती मिळावी म्हणून वर्षभर संघर्ष करावा लागत आहे. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच असून, प्रशासनही त्यांना माहिती देण्यास तयार नाही. जिल्ह्याचा कारभार हाकण्याची जबाबदारी आणि त्यासाठी नियोजन व धोरण ठरविणारे हेच ते सदस्य. परंतु मागील दोन वर्षांत सिंचन विभागामार्फत काय कामे केली, याची माहिती नंदा ठोंबरे यांना मिळत नाही. त्यांनी दि. १३ जानेवारी २०१४ रोजी पहिल्यांदा माहिती मागितली होती. त्यानंतर २४ जानेवारी, ४ आॅगस्ट, ७ आॅगस्ट असा सातत्याने या माहितीसाठी त्यांनी संबंधित विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रासह पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मदतीला २० ते २२ सदस्यही धावून आले. परंतु त्यांना माहिती काही मिळाली नाही. विशेष म्हणजे नंदा ठोंबरे या जलव्यवस्थापन समितीच्या सदस्या आहेत. याच समितीच्या कामकाजाची माहिती त्या मागत आहेत.
माहिती द्या हो माहिती... जि.प. महिला सदस्याचा टाहो
By admin | Updated: December 22, 2014 01:21 IST