शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

६० टक्के वसुली द्या, जिल्हा भारनियमनमुक्त करू

By admin | Updated: May 11, 2015 00:30 IST

जालना : विजेपासून कोणी वंचित राहू नये, हाच वीज वितरण कंपनीचा प्रयत्न आहे. जालना जिल्हा भारनियमनमुक्त करण्यासाठी कंपनी ४० टक्के तोटा सहन करण्यास तयार आहे.

 

जालना : विजेपासून कोणी वंचित राहू नये, हाच वीज वितरण कंपनीचा प्रयत्न आहे. जालना जिल्हा भारनियमनमुक्त करण्यासाठी कंपनी ४० टक्के तोटा सहन करण्यास तयार आहे. मात्र वीज ग्राहकांनी किमान ६० टक्के तरी वसुली द्यावी, तर सहा महिन्यात जिल्हा भारनियमनमुक्त करू, असे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. राजेश टोपे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान यांची उपस्थिती होती. बावनकुळे पुढे म्हणाले की, ५ डिसेंबर २०१४ पासून राज्याचा उर्जामंत्री म्हणून मी काम सुरू केले. ग्राहक सेवा मजबूत करणे, कमी दरात वीज देणे, विजेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. वीज वितरण कंपनीवर ५५ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच जनतेला लोकाभिमूख सेवा देता येत नाही. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता, महिनाभरात अडीच हजार वीजपंपांना जोडणी द्यावी लागणार आहे. जालना शहरात ७६ फिडरवर भारनियमन असून २५ हजार घरगुती ग्राहकांकडे भारनियमन आहे. केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी ८ कोटींची मदत देण्याचे खा. दानवे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात ११ हजार पंपांना वीज कनेक्शन नाही. ते देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली असून या समितीकडे ४० कोटींचा निधी या कामासाठी देण्यात येणार आहे. राजीव गांधी विद्युतीकरण योजनेच्या कामांमध्ये अनियमिततता झाल्याच्या तक्रारी असल्याने या कामांची देखील चौकशी करण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. वीज गळती कमी झाल्यास विजेचे दर कमी होतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्ह्यात अशोक बिल्डकॉन कंपनीकडे ४५ कोटी रुपयांची कामे सुरू होती. मात्र कंपनीने त्यापैकी ५० टक्केही कामे केलेली नाहीत. त्यामुळे या कंपनीला देण्यात आलेली कामे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय या कंपनीकडून करण्यात आलेल्या १५४ कोटींच्या कामांबद्दल तक्रारी असून या कामांची अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोमार्फत चौकशी करण्याचा वीज वितरण कंपनीचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन बंद करण्यात येत असल्याचे उर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना आता मुख्यालयीच राहावे लागणार आहे. जो अधिकारी अप-डाऊन करेल, त्याच्यावर सुरूवातीला तीन महिने तात्पुरती कारवाई केली जाईल. मात्र त्यानंतर संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले. जालना शहरासाठी आयपीडीसी ही नवीन योजना देण्याची घोषणा यावेळी उर्जामंत्री बावनकुळे यांनी केली. या योजनेअंतर्गत भूमिगत विद्युतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय स्कडा (संगणकीकृत) योजनेच्या कामासाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित असून ही कामे लवकर करण्यात येणार आहेत. जळालेले रोहित्र सात दिवसात बदलून द्या ४ज्या गावात रोहित्र जळालेले आहेत, तेथे नवीन रोहित्र सात दिवसात बदलून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच रोहित्र गावातून आणून परत नवीन रोहित्र घेऊन जाण्याचा खर्च शेतकऱ्यांनी करावयाचा नाही, तर तो खर्च वीज वितरण कंपनी करेल. जर अधिकारी हा खर्च करण्याचे सांगत असतील किंवा खर्च करावा लागला असेल तर शेतकऱ्यांनी संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्या, असेही उर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.