शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

आल्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केळगाव : परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, बाजारात आल्याचे भाव प्रचंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केळगाव : परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, बाजारात आल्याचे भाव प्रचंड कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे आल्याचा लागवड खर्च तरी निघेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यंदा विहिरींना मुबलक पाणी असल्याने केळगाव परिसरात नगदी पैसे देणारे पीक म्हणून आले लागवडीचे क्षेत्र वाढले होते. एकरी १०० ते १५० क्विंटल मिळणारे उत्पन्न व दरवर्षी मिळणारा चांगला भाव यामुळेही शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. सरासरी चार ते पाच हजार प्रतिक्विंटलप्रमाणे बेणे खरेदी करुन केलेली लागवड, त्यानंतर खते, औषध फवारणी, मजुरी यावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. भाव घसरणीला लागलेला असताना आल्याला कमीत कमी १,८०० ते २,००० रुपये क्विंटल भाव मिळेल, असा शेतकऱ्यांना अंदाज होता. कारण तीन महिन्यांपूर्वी याच भावात आल्याची विक्री होत होती. मात्र, ऐन पीक काढणीची वेळ आणि भावात प्रचंड घसरण झाल्याने आल्याचा दर ८०० ते ९०० रुपये क्विंटलवर आला आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. आतापर्यंत झालेला खर्च, मजुरीचा दर आणि हाती येणारे उत्पन्न यात मोठी तफावत असून, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरते हादरले आहेत. त्यातच आता विहिरींची पाणीपातळी कमी झाल्यामुळे नाईलाजाने शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना आल्याची विक्री करत आहेत.

कोट

यावर्षी मी आल्याची लागवड केली आहे. बेणे आणण्यासह त्यावर खूप खर्चही केला. पीकही चांगले आले आहे व वजनही चांगले भरत आहे. मात्र, भाव मिळत नसल्याने अवघड झाले आहे. किमान खर्च तरी निघावा एवढीच अपेक्षा आहे.

- भगवान कोठाळे, शेतकरी, केळगाव.

कोट..

अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. त्यात आले पिकातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाव गडगडल्याने भ्रमनिरास झाला आहे. पिकासाठी केलेला खर्च व मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी तफावत आहे. यामुळे कर्जाचा डोंगर आणखीनच वाढत जाणार आहे.

- स्वप्नील शिंदे, शेतकरी, आधरवाडी.

फोटो : केळगाव परिसरात आले लागवड करतानाचे छायाचित्र.