शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

घाडगे दाम्पत्याची हत्या करून सोम्याने खुलेआम चालविली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:41 IST

: गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या शेºया भोसले (१९ रा.गेवराई) हा सहा दिवसांपासून गेवराई ते अंबड अशी रिक्षा चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या शेºया भोसले (१९ रा.गेवराई) हा सहा दिवसांपासून गेवराई ते अंबड अशी रिक्षा चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. सोम्यासह अन्य एकाने घरात प्रवेश करीत घाडगे यांचा दारूच्या नशेत काटा काढल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.२३ आॅगस्ट रोजी पहाटे भवानी बँकेचे वसुली अधिकारी आदिनाथ घाडगे व त्यांची पत्नी अलका घाडगे यांची चोरांनी हत्या करून त्यांच्या दोन मुलींवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी कंबर कसली होती. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व गेवराई पोलीस हे तपास करण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करीत होते. बँक, घरगुती, वसुली, भांडण, चोरी यासारख्या विविध मुद्यांना डोळ्यासमोर ठेऊन पोलीस तपास करीत होते. परंतु हाती काहीच ठोस असा धागा लागत नव्हता. त्यातच पोलिसांना घटनास्थळी अपेक्षित पुरावे न मिळाल्याने हा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.दरम्यान, पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची चाचपणी केली. परंतु काहीच हाती लागले नाही. हे गुन्हेगार जवळपासचे असू शकतात, असा संशय पोलिसांना आला. त्याप्रमाणे त्यांनी गेवराईतील सर्व आरोपी शोधले. परंतु सोम्या काही केल्या येत नव्हता. त्यामुळे संशय बळावला. तसेच खबºयांमार्फत पोलिसांनी ठोस असा पुरावा मिळाला. मग संशयाला दुजोरा मिळाला.रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सोम्या मित्रांसोबत दारू पीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबूली दिली.तत्पूर्वी, सोम्यासह अन्य एकाने घाडगे यांची हत्या दारूच्या नशेतच केली असावी, असा संशय व्यक्त होत होता. याला पोलिसांकडून दुजोरा मिळाला. हत्या करून पसार झालेल्या सोम्याने दुसºया दिवसापासूनच अगदी ‘सभ्य’ बनत गेवराई ते अंबड असा रिक्षा चालविला. पोलिसांसह कोणालाच त्यावर संशय आला नव्हता.एवढा गंभीर गुन्हा करूनही सोम्याने अशा प्रकारे खुलेआम रिक्षा चालविणे म्हणजे तो किती शांत डोक्याने गुन्हे करीत असे हे लक्षात येते.