शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वैजापूरकरांची धुळीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे ...

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सत्तर टक्के डांबरीकरण झाल्याने शहरवासीयांची खड्डेमय रस्त्यातून मुक्तता झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी शहरातून जाणाऱ्या नाशिक-निर्मल राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले. येवला तालुक्याच्या सीमेपासून ते शिऊर बंगल्यापर्यंत २९ किलोमीटर महामार्गासाठी १२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; परंतु या महामार्गाच्या क्राँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे अंदाजपत्रकात बदलही झाला. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाले. मात्र, या महामार्गाचे डांबरीकरणाचे काम रखडले गेले होते. त्यात यंदा पाऊस चांगला झाला, ही बाब दिलासा देणारी जरी असली तर या पावसाने मात्र राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था केली. रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

-------

धुळीमुळे श्वास गुदमरला

विनायकराव पाटील महाविद्यालय ते नांदगावपर्यंतच्या रस्त्यावर मुरूम व माती टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर दलदल सुरू झाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी व नंतर महामार्गावर धूळ व खड्ड्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हीच परिस्थिती वैजापूर शहरातही निर्माण झालेली होती. वैजापूरकरांना खड्डे व धुळीच्या लोटाचा त्रास सहन करावा लागला. महामार्गालगत असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले. धुळीमुळे शहरवासीयांचा श्वास गुदमरला होता.

------

डांबरीकरण झाले अन् त्रासापासून सुटका

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास ७० टक्के डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात रस्त्याची कामे रखडली होती. त्यानंतर ती सुरळीत होऊ लागली. त्यामुळे वैजापुरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतून मुक्तता मिळाली आहे.

------------

फोटो : वैजापूर शहरातील स्टेशन रोडवर आता गुळगुळीत झाला असून वाहनधारकांची धुळीपासून मुक्तता झाली.