शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

वैजापूरकरांची धुळीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे ...

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सत्तर टक्के डांबरीकरण झाल्याने शहरवासीयांची खड्डेमय रस्त्यातून मुक्तता झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी शहरातून जाणाऱ्या नाशिक-निर्मल राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले. येवला तालुक्याच्या सीमेपासून ते शिऊर बंगल्यापर्यंत २९ किलोमीटर महामार्गासाठी १२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; परंतु या महामार्गाच्या क्राँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे अंदाजपत्रकात बदलही झाला. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाले. मात्र, या महामार्गाचे डांबरीकरणाचे काम रखडले गेले होते. त्यात यंदा पाऊस चांगला झाला, ही बाब दिलासा देणारी जरी असली तर या पावसाने मात्र राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था केली. रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

-------

धुळीमुळे श्वास गुदमरला

विनायकराव पाटील महाविद्यालय ते नांदगावपर्यंतच्या रस्त्यावर मुरूम व माती टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर दलदल सुरू झाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी व नंतर महामार्गावर धूळ व खड्ड्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हीच परिस्थिती वैजापूर शहरातही निर्माण झालेली होती. वैजापूरकरांना खड्डे व धुळीच्या लोटाचा त्रास सहन करावा लागला. महामार्गालगत असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले. धुळीमुळे शहरवासीयांचा श्वास गुदमरला होता.

------

डांबरीकरण झाले अन् त्रासापासून सुटका

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास ७० टक्के डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात रस्त्याची कामे रखडली होती. त्यानंतर ती सुरळीत होऊ लागली. त्यामुळे वैजापुरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतून मुक्तता मिळाली आहे.

------------

फोटो : वैजापूर शहरातील स्टेशन रोडवर आता गुळगुळीत झाला असून वाहनधारकांची धुळीपासून मुक्तता झाली.