शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

‘पर्यावरण’ची मान्यता मिळवू

By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST

उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी थांबले आहे. परवानगीसाठी व्यक्तिशा लक्ष घालून दोन दिवसात

उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी थांबले आहे. परवानगीसाठी व्यक्तिशा लक्ष घालून दोन दिवसात याबाबतची प्रक्रिया पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिली. उर्वरित १६.३३ टीएमसी पाणी आणण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासंदर्भात झालेल्या या बैठकीला जलसंपदा विभागाच्या प्रधानसचिव मालिनी शंकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, आ. राहुल मोटे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. ज्ञानराज चौगुले, आ. भीमराव धोंडे यांच्यासह सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मराठवाड्याला मिळावयाच्या २३.६६ टीएमसी पैकी पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी आणण्यासंबंधीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी सदरील काम मागील काही महिन्यापासून रखडलेले आहे. याबाबतचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. परवानगीसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून सदर प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये व्यक्तिशा लक्ष घालून येत्या दोन दिवसात परवानगी मिळवू, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. सदर कामासाठी तीन वर्षात ३०० कोटी निधीची आवश्यकता असून, याबाबतची तरतूद करावी, अशी मागणी केल्यानंतर या कामाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान ७ टीएमसी पाणी आणण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असले तरी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कोठून आणणार? हे स्पष्ट करावे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीत सांगितले. तंटा लवाद क्र. २ नुसार ८१ टीएमसी पाणी मिळणार आहे. मात्र या ८१ टीएमसी पाण्याच्या वाटणीत मराठवाड्याचा कोठेही उल्लेख नसल्याने मराठवाड्याला द्यावयाचे उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कधी व कसे येणार? असेही आ. पाटील यांनी या बैठकीत विचारले.मराठवाड्याला द्यावयाचे १६.६६ टीएमसी पाणी कागदावरच असल्याचे पुढे आल्यानंतर याबाबत सखोल अभ्यास करून पाणी आणण्यासाठी पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान पुण्यातील मुळशी धरणातील पाणी टाटा कंपनी वीज निर्मितीसाठी वापरते. यासाठी वापरलेले ४० टीएमसी पाणी कोकणात वाहून जाते. वाहून जाणाऱ्यापैकी काही पाणी भीमा खोऱ्यात सोडून तेथून त्यातील १६.६६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते, अशी संकल्पना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. याबाबत सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याची तयारी दाखविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही याला होकार देत सदर प्रस्ताव आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.