शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

शहरातला कचरा रस्त्यावर !

By admin | Updated: March 29, 2016 00:46 IST

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़ गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, शहरात जिकडे तिकडे कचरा साचला आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ कचऱ्याच्या प्रश्नावर नांदगांव ग्रामस्थ व मनपा अधिकाऱ्यांची बैठक अनेकदा झाली़ परंतू, तोडगा निघाला नसल्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर कचरा साचला आहे़ हरीत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लातूर मनपाने केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावता डेपोवर कचरा टाकला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़लातूर शहरातील कचरा नांदगांव येथील कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो़ परंतू, ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात नाही़ शिवाय, कचरा डेपोला संरक्षण भिंत बांधली गेली नाही़ तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते़ त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ परिसरातील पाणी दूषीत होत आहे़ त्यामुळे नागरिकांनी हरीत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंत बांधण्याचे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या़ परंतू, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कचरा टाकला जात असल्याने गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे़ त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातला कचरा शहरातल्या रस्त्यांवर साचत आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने सद्यस्थितीत शहरात ३ हजार टन कचरा साचला आहे़ पोलिस बंदोबस्तात मनपाने कचरा डेपोवर कचरा टाकण्या प्रयत्न केला़ परंतू, नांदगांव व परिसरातील गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे़ दररोज २५ ट्रॅक्टर कचरा डेपोवर टाकला जात होता़ दोन दिवसांपूर्वी १५ ट्रॅक्टर कचरा पोलिस बंदोबस्तात टाकण्यात आला़ ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी विरोध केला आहे़ त्यामुळे पुन्हा शहरातला कचरा ठप्प झाला आहे़ औसा रोड, नांदेड नाका, विवेकानंद चौक, रेणापूर नाका व रिंगरोड परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत़ स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांनी गावकऱ्यांची भेट घेवून कचरा डेपोवर टाकण्या संदर्भात विनंती केली़ परंतू, अगोदर न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना करा नंतरच कचरा टाका अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे़ (प्रतिनिधी)