शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
4
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
5
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
6
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
7
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
8
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
9
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
10
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
11
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
13
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
14
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
17
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
18
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
19
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
20
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

शहरातला कचरा रस्त्यावर !

By admin | Updated: March 29, 2016 00:46 IST

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़ गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, शहरात जिकडे तिकडे कचरा साचला आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ कचऱ्याच्या प्रश्नावर नांदगांव ग्रामस्थ व मनपा अधिकाऱ्यांची बैठक अनेकदा झाली़ परंतू, तोडगा निघाला नसल्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर कचरा साचला आहे़ हरीत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लातूर मनपाने केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावता डेपोवर कचरा टाकला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़लातूर शहरातील कचरा नांदगांव येथील कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो़ परंतू, ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात नाही़ शिवाय, कचरा डेपोला संरक्षण भिंत बांधली गेली नाही़ तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते़ त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ परिसरातील पाणी दूषीत होत आहे़ त्यामुळे नागरिकांनी हरीत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंत बांधण्याचे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या़ परंतू, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कचरा टाकला जात असल्याने गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे़ त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातला कचरा शहरातल्या रस्त्यांवर साचत आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने सद्यस्थितीत शहरात ३ हजार टन कचरा साचला आहे़ पोलिस बंदोबस्तात मनपाने कचरा डेपोवर कचरा टाकण्या प्रयत्न केला़ परंतू, नांदगांव व परिसरातील गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे़ दररोज २५ ट्रॅक्टर कचरा डेपोवर टाकला जात होता़ दोन दिवसांपूर्वी १५ ट्रॅक्टर कचरा पोलिस बंदोबस्तात टाकण्यात आला़ ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी विरोध केला आहे़ त्यामुळे पुन्हा शहरातला कचरा ठप्प झाला आहे़ औसा रोड, नांदेड नाका, विवेकानंद चौक, रेणापूर नाका व रिंगरोड परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत़ स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांनी गावकऱ्यांची भेट घेवून कचरा डेपोवर टाकण्या संदर्भात विनंती केली़ परंतू, अगोदर न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना करा नंतरच कचरा टाका अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे़ (प्रतिनिधी)