शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नगरच्या वाहनचोरांची टोळी औरंगाबादेत अटक

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.

औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश मारोती मोहिते (१८), सागर रामदास गायकवाड (२१), आदिनाथ ऊर्फ अजय भीमा धनवटे (१९) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील रहिवासी आहेत. आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, औरंगाबादेतून वाहन चोरून अहमदनगरला घेऊन जाणारी एक टोळी चिकलठाणा परिसरातील हिनानगरात आली आहे, अशी माहिती खबऱ्याकडून पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या विशेष पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाचे फौजदार प्रशांत आवारे, सहायक फौजदार कल्याण शेळके, योगेश गुप्ता, सचिन काशीद, विवेकानंद औटी, संदीप धर्मे यांनी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी छापा मारला. तेथे वरील चारही आरोपी सापडले. त्यांच्याकडे पाच दुचाकी आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच आरोपींनी या पाचही दुचाकी चोरीच्या असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यातील एक दुचाकी पुण्यातून चोरटल्याचे, एक नगर जिल्ह्यातील राहुरीतून व दोन औरंगाबादेतून चोरी केल्याचे उघडकीस आले. सध्या चोरटे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.