शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यात यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा सप्टेंबर महिन्यात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक सूचना ...

औरंगाबाद : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा सप्टेंबर महिन्यात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यामुळे यंदाही जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी साेमवारी आदेश जारी केले आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने तिसरी लाट येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काय करावे, काय करू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार निर्बंध कायम राहणार असून गणेशोत्सवात कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे, गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परवानगीविना सार्वजनिक गणपतीची स्थापना करू नये. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरीता २ फूटांची मूर्ती असावी. श्रींच्या मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीबाबत आग्रह धरू नये. सास्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य शिबिरे घ्यावीत. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी करू नये. सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करू नये. तसेच महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करू नये. श्री गणेशाच्या आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढू नये.

जिल्ह्यातील मूर्तिकारांवर संकट

जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शासन परिपत्रकानुसार देण्यात आले असून या आदेशांमुळे मूर्तिकारांवर संकट आले आहे. गेल्यावर्षीदेखील कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधामुळे मागील वर्षी गणपतीच्या मोठ्या मूर्ती खूप शिल्लक राहिल्या होत्या.