शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

फळभाज्या महाग; गृहिणी चिंतेत

By admin | Updated: June 16, 2014 01:10 IST

औरंगाबाद : मेथी, कोथिंबीर १० रुपये गड्डी, कारले, दोडके ६० ते ८० रुपये किलो, फुलगोबी ६० रुपये किलो हे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत.

औरंगाबाद : मेथी, कोथिंबीर १० रुपये गड्डी, कारले, दोडके ६० ते ८० रुपये किलो, फुलगोबी ६० रुपये किलो हे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने घरातील महिन्याचे बजेट बिघडले आहे. महागाईमुळे आज कोणती भाजी करावी, असा प्रश्न गृहिणींना पडत आहे. पावसाळा सुरू झाला; पण अपेक्षित पाऊस पडला नाही. मागील आठवड्यात तर पावसाने दडीच मारली. परिणामी, शेतातील पालेभाज्या, फळभाज्या पाण्याअभावी खराब होऊ लागल्या आहेत. जाधववाडीतील मोंढ्यात आवक घटल्याने शहरात भाजीपाला महागला आहे. एरव्ही ३ ते ४ रुपयांत मिळणारी मेथी व कोथिंबिरीची गड्डी १० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. किलोभर कारले किंवा दोडके विकत घेण्यासाठी ८० रुपये मोजावे लागतआहेत.गवार शेंग ५० ते ६० रुपये, फुलगोबी ६० रुपये, दुधीभोपळा, पत्ताकोबी प्रत्येकी ३० रुपये, टोमॅटो २५ रुपये किलोने विकले जातआहेत. यात काकडीचाही भाव चढला असून ४० रुपयांखाली काकडी विकत मिळतच नाही. काही नसेल तर बटाट्याची भाजी केली जाते; पण बटाटाही २५ ते ३० रुपये किलोने मिळत आहे. सध्या पालक ५ रुपये गड्डी मिळत आहे.औरंगपुरा भाजीमंडईत काही जण एक किलोऐवजी अर्धा किंवा पावशेर भाजी खरेदी करण्यातच समाधान मानत आहेत. पल्लवी राजपूत या गृहिणीने सांगितले की, भाजी विक्रेते नफा कमी करून भाज्या विक्री करीत नाहीत आणि खराब झाल्यावर भाज्या फेकून देतात. नफा कमी केल्यास सर्व भाज्या विकल्या जातील, फेकून देण्याची वेळ येणार नाही. हातगाडीवाले गायबभाज्यांचे दर कमी असतील तेव्हा गल्लीबोळात भाजी विक्रेते हातगाडी घेऊन फिरतात. मात्र, भाज्या महागल्याने हातगाडीवाले गायब झाले आहेत. कारण, महागड्या भावात त्यांच्याकडून कोणी भाजी खरेदी करीत नाही. परिणामी, सध्या भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांना भाजीमंडीतच जावे लागत आहे. वरून चांगलाआतून सडलेला खराब कांद्याची बाजारात आवक होत आहे. वरून चांगला व आतून सडलेला कांदा जास्त प्रमाणात येत आहे. परिणामी, चांगल्या कांद्याचा भाव चढला असून कांदा प्रतिकिलोे २५ ते ३० रुपये विकला जात आहे.