शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकरी समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:58 IST

विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला.जुना जालना भागातील गांधीचमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या पिकाला हमी भाव नसल्याने कवडीमोल दरात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.आधीच दुष्काळाची दाहकता सोसत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना शासनाकडून कुठलाच दिलासा मिळत नसल्याने शेतकºयांत संताप आहे. कर्ज काढून शेतकºयांना शेती करावी लागत आहे. आणि त्यातच निघालेल्या मालाला बाजारात योग्य भावच नसल्याने शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांनी केला. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांनी निषेध व्यक्त केला.शेतकºयांना बिनशर्त संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या शेतमालाला हमी देण्यात यावा, २०१६-१७ खरीप हंगामात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, खडकपूर्णा धरणातील पाणी सिंचनासाठी सोडावे, २०१६-१७ चा पीकविमा मंजूर करण्यात यावा, शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर शेततळ्यासाठी प्लास्टीक पन्नी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात करा, ५५ वर्षे वयाच्या शेतकºयांना पेन्शन देण्यात यावे, आणि समृध्दी महामार्गात ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना ५० वर्षांचे उत्पन्न गृहीत धरून मोबदला देण्यात यावा, बाधित शेतकºयांचे पुनर्वसन करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील वरूड नाव्हा, पिरकल्याण, वडगाव, वखारी, पत्रातांडा, नंदापूर, कडवंची, पानशेंद्रा, धारकल्याण, बोरखेडी, देवमूर्ती, सोमनाथ जळगाव, भिलपुरी, ब्राह्मणखेडा, आनंदवाडी, धावेडी, थार, अहंकार देऊळगाव, अंभोरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी मोर्चात सहभाग होता.