विलास चव्हाण , परभणीसमाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून मागासवर्गीयांना शंभर टक्के अनुदानावर टीनपत्राचे वाटप करण्यात येते़ परंतु, दोन वर्षांपासून साडेचारशे लाभार्थ्यांना टीनपत्राचे वाटपच करण्यात आले नाही़ यामुळे लाभार्थीं लाभापासून वंचित राहिले आहेत.जिल्हा परिषद विभागाच्या वतीने शासनाकडून विविध विकास उपयोगी योजना राबविल्या जातात़ परंतु, या योजना तळागाळापर्यंत्त पोहचत नसल्याने खरा लाभार्थीं योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे़ या योजना कागदोपत्रीच राबविल्या जातात की काय असा सवाल लाभार्थ्यांना पडला आहे़ जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष फंडातून मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर ७ टीनपत्रे देण्यात येतात़ परंतु, ४१५ मागावसर्गींय लाभार्थ्यांसाठी २ हजार ९०५ टीनपत्रे गोदामात येऊन पडली आहेत़ परंतु जि़ प़ सदस्य व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या टीनपत्राचे लाभार्थ्यांना वाटपच झाले झाले नाही़ यामुळे जिल्ह्यातील लाभार्थीं लाभापासून वंचित आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.पदाधिकाऱ्यांत उदासिनतामागासवर्गीय लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी टिनपत्रे गोदामातून येऊन पडली आहेत़ परंतु, टिनपत्रे कोणाला द्यायचे कारणावरुन समितीत एक वाक्यता न झाल्याने जिल्ह्यातील ४१५ लाभार्थीं अद्यापही लाभापासून वंचित आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यातून नाराजी व्यक्त होत आहे़लाभार्थ्यांसाठी टीनपत्रे घेऊन ठेवण्यात आली आहेत. ही टीनपत्रे तालुक्यातील गोदामध्ये धूळखात पडली आहेत.तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्यापरभणी७५जिंतूर७९पाथरी३३पालम३७सोनपेठ२५सेलू४१मानवत२९गंगाखेड५०पूर्णा४६एकूण४१५पावसाळ्यापूर्वीच टीनपत्रे देणे गरजेचे मागासवर्गीयांना १०० टक्के अनुदानावर टीनपत्रे वाटप केले जातात. मात्र टीनपत्रे पावसाळ्यापूर्वी दिली असती तर याचा लाभ झाला असता. कारण पावसाळ्यामध्ये लाभार्थ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला असता. परंतु, टीनपत्रे वाटप न केल्याने या लाभार्थ्यांचा संसार उघड्यावरच राहणार आहे. याकडे समितीतील सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
साडेचारशे लाभार्थीं टीनपत्रापासून वंचित
By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST