शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

चार वर्षे झोप अन् निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचा धडाका !

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला.

लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला. सिटी बस योजनाही बारगळली अन् आता निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली उद्घाटन व भूमिपूजनाचा धूमधडाका मनपाने सुरू केला आहे.महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी विकास कामांकडे तसेच योजना राबविण्यास दुर्लक्ष केल्यामुळे चौदावा वित्त आयोग, नगरोत्थान योजना आणि सिटी बस योजनेचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी परत गेला आहे. भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना ३२ कोटींची होती. या योजनेअंतर्गत तीनवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु, उदासीन भूमिकेमुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, योजनेचा निधी परत गेला आणि आता साडेचार वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी नंदी स्टॉप परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी अशोक हॉटेल चौकाचे नामकरण केले. हायमास्ट दिवे बसविण्याचाही फार्स सुरू केला आहे. २६ डिसेंबर रोजी सम्राट चौक येथे समाज मंदिराचे भूमिपूजन आणि कबाले वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर बार्शी रोडवरील पाण्याची टाकी परिसरात विविध विकास कामांचा प्रारंभ २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सूरत शाहवली दर्गाह इमारतीच्या सुशोभिकरण कामाचा प्रारंभ २७ डिसेंबर रोजी केला जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातील रेल्वे स्टेशन रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन २४ डिसेंबर रोजी होणार आहे. असे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे मनपा पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहे. गेल्या साडेचार वर्षांचा लेखाजोखा घेतला तर झोपकाढू धोरण प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे होते. आता निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या स्थायीच्या बैठकीत ४७ विषयांना मंजुरी दिली. (प्रतिनिधी)