शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

चार बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

By | Updated: December 2, 2020 04:10 IST

शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी ...

शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी केले. या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्या कुठेच आढळून आला नाही. करजगावातील हा हल्ला बिबट्याचा नसल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे. कारण हल्ला झालेल्या परिसरात बिबट्याच्या पायांच्या ठशाची पाहणी करण्यात आली; पण ते ठसे बिबट्याचे पायाचे नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

करमाड, पिंप्रीराजा, गोलटगाव, आडगाव, कौडगाव, कोळघर, सटाणा, शिवारात बिबट्या असल्याची चर्चा होती. त्यातच रविववारी पहाटे करजगाव शिवारात सुदाम भेरे यांच्या शेतातील बंदिस्त जाळीत बिबट्याने प्रवेश करीत ४ बकऱ्यांंचा फडशा पाडून ७ बकऱ्यांंना जखमी केले. बकऱ्यांची आरडाओरड ऐकून शेजारील शेतकऱ्यांनी यांची माहिती सुदाम भेरे यांना दिली. माहिती मिळताच सुदाम भेरे आपल्या मुलासोबत शेतात गेले असता त्यांना दुचाकी लाइटच्या उजेडात बिबट्या बकऱ्या फाडताना दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने इतर शेतकरी मदतीसाठी येईपर्यंत बिबट्या निघून गेला होता. याची माहिती वनविभाग व करमाड पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी आले. मात्र, हा हल्ला बिबट्याचा नसून इतर प्राण्याचा असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या सांगण्यानुसार जर बिबट्या असता तर शेतात त्याच्या पायांचे ठसे आढळून आले असते.

-------

- वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळासह परिसरातील प्राण्यांच्या पायाच्या ठशाची पाहणी केली असता बिबट्याचे पदमाग दिसून आले नाही. सदर पदमाग हे वन्यजीव अभ्यासकांनी तडस या प्राण्यांचे असल्याचे सांगितले; परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो बिबट्याच होता. बिबट्याच्या धास्तीने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

- वनरक्षक के. पी. शिंदे म्हणाले की, बिबट्याचे वास्तव्य निश्चित नसल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रंचड दहशत पसरली असून, शेतात जाणाऱ्या महिलांसह रात्री रबी पिकाला पाणी देणारे शेतकरी धास्तावले आहेत.

- शेतकऱ्यांनी आपले जनावरे बंदिस्त ठेवावे, रात्रीच्या वेळेस शेतात एकट्याने जाण्याचे टाळावे, लहान मुलांना व महिलांना शेतात निर्मनुष्य ठिकाणी पाठवू नये यासह कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या दिसला तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून केले आहे.