शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

चार बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

By | Updated: December 2, 2020 04:10 IST

शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी ...

शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी केले. या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्या कुठेच आढळून आला नाही. करजगावातील हा हल्ला बिबट्याचा नसल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे. कारण हल्ला झालेल्या परिसरात बिबट्याच्या पायांच्या ठशाची पाहणी करण्यात आली; पण ते ठसे बिबट्याचे पायाचे नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

करमाड, पिंप्रीराजा, गोलटगाव, आडगाव, कौडगाव, कोळघर, सटाणा, शिवारात बिबट्या असल्याची चर्चा होती. त्यातच रविववारी पहाटे करजगाव शिवारात सुदाम भेरे यांच्या शेतातील बंदिस्त जाळीत बिबट्याने प्रवेश करीत ४ बकऱ्यांंचा फडशा पाडून ७ बकऱ्यांंना जखमी केले. बकऱ्यांची आरडाओरड ऐकून शेजारील शेतकऱ्यांनी यांची माहिती सुदाम भेरे यांना दिली. माहिती मिळताच सुदाम भेरे आपल्या मुलासोबत शेतात गेले असता त्यांना दुचाकी लाइटच्या उजेडात बिबट्या बकऱ्या फाडताना दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने इतर शेतकरी मदतीसाठी येईपर्यंत बिबट्या निघून गेला होता. याची माहिती वनविभाग व करमाड पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी आले. मात्र, हा हल्ला बिबट्याचा नसून इतर प्राण्याचा असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या सांगण्यानुसार जर बिबट्या असता तर शेतात त्याच्या पायांचे ठसे आढळून आले असते.

-------

- वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळासह परिसरातील प्राण्यांच्या पायाच्या ठशाची पाहणी केली असता बिबट्याचे पदमाग दिसून आले नाही. सदर पदमाग हे वन्यजीव अभ्यासकांनी तडस या प्राण्यांचे असल्याचे सांगितले; परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो बिबट्याच होता. बिबट्याच्या धास्तीने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

- वनरक्षक के. पी. शिंदे म्हणाले की, बिबट्याचे वास्तव्य निश्चित नसल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रंचड दहशत पसरली असून, शेतात जाणाऱ्या महिलांसह रात्री रबी पिकाला पाणी देणारे शेतकरी धास्तावले आहेत.

- शेतकऱ्यांनी आपले जनावरे बंदिस्त ठेवावे, रात्रीच्या वेळेस शेतात एकट्याने जाण्याचे टाळावे, लहान मुलांना व महिलांना शेतात निर्मनुष्य ठिकाणी पाठवू नये यासह कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या दिसला तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून केले आहे.