शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जलयुक्त शिवारचे चार कोटी रुपये गेले खर्चाविना परत

By admin | Updated: May 15, 2016 00:04 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत. परंतु तरीदेखील या योजनेचा जिल्ह्याचा तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी खर्चाअभावी परत गेला आहे. लघु सिंचन विभागाने वेळेत हा निधी खर्च न केल्यामुळे तो परत गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जलसंधारणाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाचे मंत्री, मुख्य सचिव यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दररोज या योजनेच्या कामांचा आढावा घेत आहेत. सिमेंट नाला बांध, साखळी बंधारे, गाळ काढणे यासारखी जास्तीत जास्त कामे करून येणाऱ्या काळात दुष्काळमुक्ती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही वन विभाग, कृषी विभाग, लघु सिंचन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या योजनेचा ४ कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरीस खर्चाविना परत गेला आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी बीडीएस सिस्टीमवरून वेळेत हा निधी न काढल्यामुळे मुदत संपून तो निधी परत गेला. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. निधीच्या खर्चासाठी जबाबदार असलेले लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तार खान हे नुकतेच सेवानिवृत्तही झाले आहेत.