शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जलयुक्त शिवारचे चार कोटी रुपये गेले खर्चाविना परत

By admin | Updated: May 15, 2016 00:04 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत. परंतु तरीदेखील या योजनेचा जिल्ह्याचा तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी खर्चाअभावी परत गेला आहे. लघु सिंचन विभागाने वेळेत हा निधी खर्च न केल्यामुळे तो परत गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जलसंधारणाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाचे मंत्री, मुख्य सचिव यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दररोज या योजनेच्या कामांचा आढावा घेत आहेत. सिमेंट नाला बांध, साखळी बंधारे, गाळ काढणे यासारखी जास्तीत जास्त कामे करून येणाऱ्या काळात दुष्काळमुक्ती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही वन विभाग, कृषी विभाग, लघु सिंचन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या योजनेचा ४ कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरीस खर्चाविना परत गेला आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी बीडीएस सिस्टीमवरून वेळेत हा निधी न काढल्यामुळे मुदत संपून तो निधी परत गेला. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. निधीच्या खर्चासाठी जबाबदार असलेले लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तार खान हे नुकतेच सेवानिवृत्तही झाले आहेत.