शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईच्या मातीत शेतकरी संघटनेची पायाभरणी

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईस्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव येथील रमेश मुगे हे संघटनेच्या आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरले. त्यानंतर अंबाजोगाईतील शिबिरात मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले व या विचारमंथनातून शेतकरी संघटना विचार व कार्यपद्धती या ऐतिहासिक ग्रंथाची निर्मिती झाली. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनाने आठवणींना उजाळा मिळाला.अंबाजोगाईत २२ सप्टेंबर १९८६ रोजी अखिल भारतीय ज्वारी परिषद तर २३ सप्टेंबर १९८६ रोजी शेतकरी विद्यार्थी संघटनेची निर्मिती झाली. अमर हबीब, श्रीरंग मोरे, यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय ज्वारी परिषद झाली होती. खोलेश्वर महाविद्यालयात शरद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य रा. गो. धाट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मेळावा झाला. शरद जोशी यांनी कालिदास आपेट व अ‍ॅड. सच्चिदानंद मोरे यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली होती. १९९६ साली ऊसावरील झोनबंदीचा कायदा संपविण्यासाठीचा हातोडा मोर्चा अंबासाखर कारखाना येथे झाला. या सर्व घटनांनी अंबाजोगाई हे शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी करणारे प्रमुख केंद्र ठरले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील पानगाव येथे ऊसआंदोलन झाले. या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रमेश मुगे हा शेतकरी हुतात्मा ठरला.श्रीरंगराव मोरे यांचे सहकारी दत्तू आपेट गुरुजी, अ‍ॅड. शिवाजीराव कराड, अ‍ॅड. कुंडलिक कराड, वसंतराव मोरे, अमर हबीब, नारायण पांडे, माजी सैनिक भगवानराव शिंदे, पंढरीनाथ यादव, केशव बडे, रामराव नाटकर, किसनराव बावणे, प्रा. केशव देशपांडे, प्रा. ए. बी. देशपांडे ही मंडळी पहिल्या फळीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक बनले तर शरद जोशींच्या सततच्या संपर्कामुळे अंबाजोगाई तालुक्यात अंकुशराव काळदाते, संभाजी रेड्डी, शिवाजीराव देशमुख, अनुरथ मामडगे, अशोक गुणाले, वसंत शिंदे, उत्तमराव तट, परमेश्वर पिसुरे, कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, अच्युत गंगणे, असे अनेक कार्यकर्ते शेतकरी संघटनेत मोठ्या हिरीरीने सहभागी झाले. परिणामी अंबाजोगाईला लाभलेला संघर्ष व चळवळीचा ऐतिहासिक वारसा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा अखंडित सुरू राहिला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी गिरवली, धानोरा, जवळगाव, वाला, चनई, मोरेवाडी, बोरीसावरगाव आदी गावे पिंजून काढली.शरद जोशी हे राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिला खासदार निधी पानगावला दिला. ५० लक्ष रुपयांपैकी २५ लक्ष रुपयांतून आंदोलनात हुतात्मा ठरलेल्या रमेश मुगे यांच्या नावाने ग्रंथालय व स्मारक उभारले.पहिला ‘ज्ञानश्री पुरस्कार’ शरद जोशी यांना ४शेतकरी संघटनेचे नेते श्रीरंग मोरे यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांना ज्ञानश्री पुरस्कार प्रतिवर्षी देण्याचे जाहीर केले. पहिल्या पुरस्काराचे मानकरी शरद जोशी ठरले. सन १९१२ मध्ये रोख १ लक्ष रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना अंबाजोगाईत सन्मानित करण्यात आले होते.