शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

अंबाजोगाईच्या मातीत शेतकरी संघटनेची पायाभरणी

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईस्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव येथील रमेश मुगे हे संघटनेच्या आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरले. त्यानंतर अंबाजोगाईतील शिबिरात मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले व या विचारमंथनातून शेतकरी संघटना विचार व कार्यपद्धती या ऐतिहासिक ग्रंथाची निर्मिती झाली. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनाने आठवणींना उजाळा मिळाला.अंबाजोगाईत २२ सप्टेंबर १९८६ रोजी अखिल भारतीय ज्वारी परिषद तर २३ सप्टेंबर १९८६ रोजी शेतकरी विद्यार्थी संघटनेची निर्मिती झाली. अमर हबीब, श्रीरंग मोरे, यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय ज्वारी परिषद झाली होती. खोलेश्वर महाविद्यालयात शरद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य रा. गो. धाट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मेळावा झाला. शरद जोशी यांनी कालिदास आपेट व अ‍ॅड. सच्चिदानंद मोरे यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली होती. १९९६ साली ऊसावरील झोनबंदीचा कायदा संपविण्यासाठीचा हातोडा मोर्चा अंबासाखर कारखाना येथे झाला. या सर्व घटनांनी अंबाजोगाई हे शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी करणारे प्रमुख केंद्र ठरले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील पानगाव येथे ऊसआंदोलन झाले. या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रमेश मुगे हा शेतकरी हुतात्मा ठरला.श्रीरंगराव मोरे यांचे सहकारी दत्तू आपेट गुरुजी, अ‍ॅड. शिवाजीराव कराड, अ‍ॅड. कुंडलिक कराड, वसंतराव मोरे, अमर हबीब, नारायण पांडे, माजी सैनिक भगवानराव शिंदे, पंढरीनाथ यादव, केशव बडे, रामराव नाटकर, किसनराव बावणे, प्रा. केशव देशपांडे, प्रा. ए. बी. देशपांडे ही मंडळी पहिल्या फळीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक बनले तर शरद जोशींच्या सततच्या संपर्कामुळे अंबाजोगाई तालुक्यात अंकुशराव काळदाते, संभाजी रेड्डी, शिवाजीराव देशमुख, अनुरथ मामडगे, अशोक गुणाले, वसंत शिंदे, उत्तमराव तट, परमेश्वर पिसुरे, कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, अच्युत गंगणे, असे अनेक कार्यकर्ते शेतकरी संघटनेत मोठ्या हिरीरीने सहभागी झाले. परिणामी अंबाजोगाईला लाभलेला संघर्ष व चळवळीचा ऐतिहासिक वारसा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा अखंडित सुरू राहिला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी गिरवली, धानोरा, जवळगाव, वाला, चनई, मोरेवाडी, बोरीसावरगाव आदी गावे पिंजून काढली.शरद जोशी हे राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिला खासदार निधी पानगावला दिला. ५० लक्ष रुपयांपैकी २५ लक्ष रुपयांतून आंदोलनात हुतात्मा ठरलेल्या रमेश मुगे यांच्या नावाने ग्रंथालय व स्मारक उभारले.पहिला ‘ज्ञानश्री पुरस्कार’ शरद जोशी यांना ४शेतकरी संघटनेचे नेते श्रीरंग मोरे यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांना ज्ञानश्री पुरस्कार प्रतिवर्षी देण्याचे जाहीर केले. पहिल्या पुरस्काराचे मानकरी शरद जोशी ठरले. सन १९१२ मध्ये रोख १ लक्ष रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना अंबाजोगाईत सन्मानित करण्यात आले होते.