शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पंचविशीचा तरूण बनला चाळीस मुलांचा बाप

By admin | Updated: May 27, 2014 00:55 IST

प्रताप नलावडे , बीड बहिणीचा अकाली मृत्यू आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली.

प्रताप नलावडे , बीड ेसात महिन्याच्या गरोदर बहिणीचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली. या अस्वस्थतेनेच त्याला प्रेरणा दिली आणि त्यानंतर अवघ्या वर्षभरात तो बनला १० मुलांचा बाप. नऊ वर्षापूर्वी सुरू झालेली अनाथांची ही कहाणी आता ४० मुलांवर येऊन ठेपली आहे. गेवराई येथील संतोष गर्जे या तरूणाने जिद्दीने हा ४० मुलांचा संसार पत्नी प्रीतीसह जिवाच्या कराराने पेलला आहे. अनाथांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याने उचललेले पाऊल आज एक चळवळ बनले आहे. संपूर्ण राज्यभरात संतोषच्या या कामाची आवर्जून दखल घेतली जात आहे. ऊस तोडणी कामगाराचा या मुलाने सुरूवातीच्या काळात अक्षरश: भीक मागून या मुलांचा सांभाळ केला. लोकांनी सुरूवातीला वाट्टेल ते सुनावले परंतु जेव्हा त्यांना त्याच्यातील अंतरिक तळमळ दिसू लागली तेव्हा मदतीचा हातही याच लोकांनी पुढे केला. संतोषच्या या पितृत्वाची कहाणीही चटका लावणारी आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी त्याच्या बहिणीचा अकाली मृत्यू झाला आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीचे पालकत्व त्याच्याकडे आले. तिचा सांभाळ करताना त्याला अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले. यातूनच त्याला अनाथ मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव झाली. खिशात एक रूपयाही नसताना तो विचार करीत होता समाजातील अनाथांचे पितृत्व स्वीकारण्याचा. गावोगाव भटकंती करून त्याने सुरूवातीला वेश्यांची, अकाली पितृत्व हरवलेली, तुरूंगात असणार्‍या कैद्यांची मुले त्याने सांभाळण्यासाठी आपल्याकडे घेतली आणि यातूनच सुरूवात झाली ती सहारा अनाथालय परिवाराची. आई फाऊंडेशनची स्थापना करून त्या मार्फत संतोषने सुरू केलेली ही चळवळ आता ४० मुलांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या संपूर्ण पालनपोषण करण्याची जबाबदारी संतोष पेलत असताना अनेक अडचणीलाही त्याला तोंड द्यावे लागते. अगदी किराणा माल आणण्यापासून त्याला अडचणीला तोंड द्यावे लागते, परंतु पित्याच्या मायेने हा तरूण या सगळ्यांचा सांभाळ करीत आहे. आज बीड, सोलापूर, बार्शीसह विदर्भातील मुलंही त्याच्या अनाथालयात आहेत. त्यांना चांगले शिक्षण देणे आणि स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द संतोष आणि प्रीतीला सतत कार्यरत ठेवते. गेवराईत तीन एकराच्या जागेत संतोषने पत्र्याचे शेड ठोकून आपला हा ४० मुलांचा प्रपंच थाटला आहे. तो स्वत:ही आपल्या पत्नीसह तेथेच राहतो. त्याच्यासह पाच जण मुलांचे संगोपन करतात. ६ ते १८ वयोगटाची या मुलांना सहारा अनाथालय म्हणजे स्वत:चे घरच वाटते. हे तर माणुसकीचे घर गेवराई येथील सहारा अनाथालय माणुसकीचे अनोखे घर बनले आहे. जात-पात आणि धर्मापासून सहारा परिवारातील मुलं कोसो दूर आहेत. वेगवेगळ्या परिसरातून आणि वातावरणातून आलेली ही मुलं इथं अगदी प्रेमानं आणि मायेने राहताना दिसतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही अपघाताने जोडली गेलेली ही नाती जिवापाड सांभाळतात.