शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चाळीस शेतकऱ्यांचे पैसे लटकले !

By admin | Updated: August 27, 2014 01:37 IST

पाथरूड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींची कामे करण्यात आली आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) डिजीटल स्वाक्षरीअभावी

पाथरूड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींची कामे करण्यात आली आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) डिजीटल स्वाक्षरीअभावी ४० शेतकऱ्यांच्या विहिरींचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. बिले सादर करून जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे, हे विशेष.सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाअंतर्गत सिंचन विहिरी घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार तुळजापूर, भूम आणि परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी घेतल्या. सुरूवातीच्या काळात पैसेही वेळेवर मिळत गेले. परंतु, मध्यंतरीच्या काळामध्ये परंड्यासह कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे कामाचे पेमेंट काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली. तत्कालीन गटविकास अधिकारी मुल्ला यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी सहायक गटविकास अधिकारी म्हणून टी. बी. उगलमुगले यांची नियुक्ती झाली आहे. बीडीओचे पद रिक्त असल्याने याही पदाचा पदभार त्यांच्याकडेच आला आहे. दरम्यान, सदरील पद रिक्त असल्याने डिजीटल स्वाक्षरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. डिजीटल स्वाक्षरी नसल्यामुळे तालुक्यातील चाळीसवर शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे पैसे लटकले आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना जवळपास आठ लाख रूपये येणे बाकी आहे. याबाबतीत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.डिजीटल स्वाक्षरी अभावी भूम पंचायत समितीतून रोहयोची बिले देता येत नव्हती. याबाबत ओरड होऊ लागल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने ही बिले परंडा गटविकास अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने काढण्यात आली आहेत. ४डिजीटल स्वाक्षरी नमुना मान्यतेसाठी नागपूर येथील नरेगा कार्यालयामध्ये पाठविण्यात आली आहे. ४येत्या चार ते पाच दिवसात स्वाक्षरी नमुन्यास मान्यता मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची बिले तातडीने दिली जातील, असे प्रभारी गटविकास अधिकारी टी. बी. उगलमुगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामावरील मजुरांचे पैसे देण्याला प्राधान्य दिले. जून २०१४ पासून ते आजतागायत ४० ते ४५ लाख रूपये वितरित करण्यात आले आहेत. यासाठी परंडा बीडीओंच्या डिजीटल स्वाक्षरीचा आधार घ्यावा लागला. संबंधित शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसेही सही नमुन्याला मान्यता मिळताच देण्यात येतील. यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल, असे उगलमुगले यांनी सांगितले.