शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दुसऱ्या दिवशीही औपचारिकता

By admin | Updated: June 26, 2016 00:40 IST

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे काम गुरुवारपासून

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे काम गुरुवारपासून मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुरू आहे. शुक्रवारीही १४७ नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली.मागील वर्षी शासनाने मनपाकडे शहर विकास आराखडा सुपूर्द केला. मनपा सर्वसाधारण सभेने या आराखड्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या केल्या. त्यानंतर नागरिकांसाठी आराखडा प्रसिद्ध केला. अनेक नागरिकांवर अन्याय करणारा हा आराखडा ठरला. आराखडा अत्यंत चुकीचा असल्याचे सांगून काही नागरिकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना मनपाने गुरुवारपासून आक्षेपांवर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मौलाना आझाद संशोधन केंद्रात अलोट गर्दी केली होती. माजी उपमहापौर संजय जोशी, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी संपूर्ण आराखड्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मिटमिटा येथील गट नंबर ९४ मधील नागरिकांच्या अनेक घरांवर शैक्षणिक आरक्षण टाकण्यात आले आहे. तब्बल ४२ जणांनी समितीवर प्रश्नांचा भडिमार केला. पडेगाव येथील गौतम पवार हौसिंग सोसायटीवर मनपाच्या वतीने डीपी रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. हा रस्ता केवळ कत्तलखान्यापर्यंत असून, त्याचा कोणताही फायदा नागरिकांना होणार नसून, हे चुकीचे आरक्षण टाकण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. शासकीय सदस्य म्हणून नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक अ. रा. पाथरकर, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक प्र. ते. महाजन, वास्तुविशारद अश्विनी अमोल गंभीर, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप यार्दी, तीन अशासकीय सदस्यांमध्ये नगरसेवक राज वानखेडे, गजानन मनगटे आणि अजीम खान, वसंत निकम यांची उपस्थिती होती.