शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही.

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे रेल्वेकडून या प्रकरणाचा पहिल्यापासून तपास केला जाणार आहे. यासाठी रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडूनही पुन्हा तपासणी करण्याचा विचार केला जात आहे.या पॅसेंजरला २५ आॅक्टोबर रोजी रात्री आग लागून एक अख्खी बोगी जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध शक्यतांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. शिवाय घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी केली. यासाठी फॉरेन्सिक पथकाकडून जळालेल्या बोगीतून विविध नमुने गोळा करण्यात आले. शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष या बाबी घटनेला कारणीभूत नसून फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; परंतु तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ नसल्याचा अहवाल फॉरेन्सिककडून मिळाला. त्यामुळे आगीच्या कारणाचे गूढ आणखी वाढले. घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली चार अधिकाऱ्यांची समिती अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत आली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेची सुरुवातीपासून चौकशी करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत असल्याचे दिसत आहे. या ‘द बर्निंग ट्रेन’चे रहस्य दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत असून ते कधी उलगडणार हा प्रश्न आहे.