शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही.

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे रेल्वेकडून या प्रकरणाचा पहिल्यापासून तपास केला जाणार आहे. यासाठी रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडूनही पुन्हा तपासणी करण्याचा विचार केला जात आहे.या पॅसेंजरला २५ आॅक्टोबर रोजी रात्री आग लागून एक अख्खी बोगी जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध शक्यतांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. शिवाय घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी केली. यासाठी फॉरेन्सिक पथकाकडून जळालेल्या बोगीतून विविध नमुने गोळा करण्यात आले. शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष या बाबी घटनेला कारणीभूत नसून फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; परंतु तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ नसल्याचा अहवाल फॉरेन्सिककडून मिळाला. त्यामुळे आगीच्या कारणाचे गूढ आणखी वाढले. घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली चार अधिकाऱ्यांची समिती अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत आली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेची सुरुवातीपासून चौकशी करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत असल्याचे दिसत आहे. या ‘द बर्निंग ट्रेन’चे रहस्य दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत असून ते कधी उलगडणार हा प्रश्न आहे.