शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

चारा, पाण्याअभावी जनावरांचे स्थलांतर

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईसलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न यामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले आहे. ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या पाठोपाठ शेतकरी व शेतमजूर आपली जनावरे घेऊन गावोगावी फिरत असल्याने तालुक्यातील अनेक गावे आता ओस पडू लागली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडू लागल्याने सर्वत्र जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत एकही मोठा पाऊस न झाल्याने नद्या, तलाव यांचे पाणी वाहिले नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात तर सध्या चारा व पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील चिचखंडी, येल्डा, कुरणवाडी, राक्षसवाडी, हडंगवस्ती, मंगयीवाडी, या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ऊसतोडीसाठी गेले आहेत. त्या पाठोपाठ आता गावातील उर्वरित शेतकरी व शेतमजुरही चारा व पाण्याअभावी स्थलांतर करू लागले आहेत. अगोदरच खरीप हंगामही पावसाअभावी संकटात सापडला. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, संकरित ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. परिणामी जनावरांसाठी कडबा राहिला नाही. पिण्यासाठी पाण्याचीही उपलब्धता नाही. अशा स्थितीत पशुधन जगवायचे कसे? या भेडसावणाऱ्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या संदर्भात अद्यापही प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. डोंगर परिसरातील गावांमध्ये शासनाच्या वतीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी चिचखंडी येथील सरपंच गुणवंत बिरगड यांनी केली आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना न आखल्यास तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बिरगड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत आहे.