शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

चारा, पाण्याअभावी जनावरांचे स्थलांतर

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई सलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईसलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न यामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले आहे. ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या पाठोपाठ शेतकरी व शेतमजूर आपली जनावरे घेऊन गावोगावी फिरत असल्याने तालुक्यातील अनेक गावे आता ओस पडू लागली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडू लागल्याने सर्वत्र जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत एकही मोठा पाऊस न झाल्याने नद्या, तलाव यांचे पाणी वाहिले नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात तर सध्या चारा व पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील चिचखंडी, येल्डा, कुरणवाडी, राक्षसवाडी, हडंगवस्ती, मंगयीवाडी, या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ऊसतोडीसाठी गेले आहेत. त्या पाठोपाठ आता गावातील उर्वरित शेतकरी व शेतमजुरही चारा व पाण्याअभावी स्थलांतर करू लागले आहेत. अगोदरच खरीप हंगामही पावसाअभावी संकटात सापडला. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, संकरित ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. परिणामी जनावरांसाठी कडबा राहिला नाही. पिण्यासाठी पाण्याचीही उपलब्धता नाही. अशा स्थितीत पशुधन जगवायचे कसे? या भेडसावणाऱ्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या संदर्भात अद्यापही प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. डोंगर परिसरातील गावांमध्ये शासनाच्या वतीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी चिचखंडी येथील सरपंच गुणवंत बिरगड यांनी केली आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना न आखल्यास तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बिरगड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत आहे.