शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
3
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
4
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
5
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
6
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
7
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
8
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
9
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
10
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
11
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
12
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
13
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
14
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
15
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
16
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
17
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
18
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
19
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
20
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

सिंचन, आरोग्यसह पायाभूत सुविधांवर भर

By admin | Updated: March 15, 2015 00:37 IST

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९७४ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत राजकारणात सक्रीय सहभाग आहेत. आता येथीलच राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सिंचन, आरोग्यसह पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचे येथे भरीव काम झाले आहे. दरम्यान, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच तेर येथे पहिल्यांदा विशेष बाब म्हणून ग्रामिण रुग्णालय उभारले गेले. त्यापूर्वी ग्रामिण रुग्णालय केवळ तालुका ठिकाणीच उभारण्यात येत असत. या रुग्णालयासाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन दिली. याबरोबरच तेरमध्ये चांगल्या प्रकारचे बसस्थानकही डॉ. पाटील यांच्यामुळेच उभे राहू शकले. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्या माध्यमातून या क्षेत्राततही लक्षवेधी काम झाल्याचे दिसून येते. तेरणा धरणातून गावाच्या पाईपलाईनव्दारे गावात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बरोबरच १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सोयही गावात उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असताना तेरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना उभाण्यात त्यांना यश आले. यामुळे कॅनॉलद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा हेतू होता. मात्र मागील दोन पावसाळे कोरडे गेल्याने पुरेशा पाण्याअभावी या योजनेचा सध्या लाभ होत नाही. गावामध्ये संत गोरोबा काकांचे राहते घर, बौद्ध स्तूप यांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आणणे, गोरोबा काका यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी व मंदिराला ‘ब’ दर्जा मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तेरणा नदीवर (शिरपूर पॅटर्न) सरळीकरण व खोलीकरणाचेही मोठे काम करण्यात त्यांना यश आले आल्याचे गावात फेरफटका मारला असता दिसून येते. विविध विकासकामे करण्यात यश आले असले तरी, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गावातील काही भागात आजही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून व्यापारी संकुलाची उभारणी करावी अशी मागणी असली तरी मुबलक गाळे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.