शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

औरंगाबाद-पुणे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम घेतले काढून

By admin | Updated: July 13, 2017 01:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे. ७५० कोटी रुपयांचे हे काम नाशिक विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे येथील विभागावर मोठी नामुष्की ओढवली आहे. अहमदनगरच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पाच ते सहा तासांचा अवधी नवीन उड्डाणपुलामुळे अर्ध्या तासाने घटणार आहे. नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दीड किलोमीटरचा रोड तयार करण्यासाठी डीपीआर करण्याची जबाबदारी स्थानिक एनएचएआयकडे देण्यात आली होती. हे काम पुणे विभागाकडे गेल्यामुळे येथील यंत्रणेवर अविश्वास दाखविल्याचा प्रकार घडला आहे. त्या पुलामुळे औरंगाबादमार्गे नगर ते पुण्याकडे जाणारी वाहने थेट शहराबाहेर जातील. नगरमधून सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान सुमारे दीड किलोमीटरचा हा उड्डाणपूल असेल. या मॅकेनाईज्ड रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. वाहतूक थेट नगरबाहेर जाणार असल्याने औरंगाबाद-पुणे प्रवासाला लागणारा पाच ते सहा तासांचा अवधी अर्ध्या ते एक तासाने कमी होण्याचा अंदाज आहे. या मार्गाच्या डीपीआरसाठी एनएचएआयने तयारी सुरू केलेली असताना ते काम नाशिक विभागाकडे वर्ग झाले आहे.