शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

देविसिंग राजपूत , येणेगूर पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते.

देविसिंग राजपूत , येणेगूरपर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहर येतो. मात्र यावेळी कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपद महिन्यात फुलांचा बहार आला आहे. येणेगूर परिसरातील शेतकरी निसर्गातील या बदलामुळे अचंबित झाले आहेत. आयुर्वेदात कडूलिंबाच्या वृक्षाला अणन्य साधारण महत्व आहे. या वृक्षाची, साल, फुले, पाने, फळे (लिंबोळ्या) पानाच्या काड्या यापासून अनेक उपपदार्थ बनविले जाते. त्यामध्ये लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड, कडूनिंब तेल, लिंबोळी खत, भूनंबादी काढा आदी आयुर्वेदिक उपचारासाठी तयार केले जाते. त्वचा रोग, कृमिनाशक, पिकावर फवारणीसाठी आदी अनेक कारणासाठी या वृक्षाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाला निंब वृक्षाचे मोठे फायदे आहेत. हा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदु समाजात चैत्रशुद्ध प्रतिपदेला (गुडी पाडवा) निंबफुले, हरभरा डाळ व गुळ यापासून पातळ पदार्थ बनवून घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायक म्हणून पाजले जाते. ते अनादी कालापासून त्याचे अनुकरण प्रतिवर्षी केले जाते. म्हणूनच या वृक्षास कामधेनू असेही म्हटले जाते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहार येतो असा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. मात्र यंदा येणेगूर परिसरातील आष्टामोड, सुपतगाव, येणेगूर, नळवाडी शिवारातील काही झाडांना नवीन पालवी फुटून फुलांच्या तोरांची गुच्छे बहरल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. देवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा जणूकी बदल नसून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ऋतुचक्र (उन्हाळा, हिवाळा, पावसाळा) सारखे पुढे जात असल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. सतत तीन ते चार वर्ष एखाद्या वृक्षाला वर्षातून दोनदा बहर येत असेल तो जनूकीय बदल असे म्हणता आले असते. मात्र लिंब वृक्ष निलेसी परिसरातील असून, अगादी रिक्टीका इंदिका असे वनस्पती शास्त्रीतील त्याचे नाव आहे. या परिवारातील वृक्षांना वर्षातून एकदाच फुले व फळे येतात असेही डॉ. देवरकर यांनी सांगितले.