शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

देविसिंग राजपूत , येणेगूर पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते.

देविसिंग राजपूत , येणेगूरपर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहर येतो. मात्र यावेळी कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपद महिन्यात फुलांचा बहार आला आहे. येणेगूर परिसरातील शेतकरी निसर्गातील या बदलामुळे अचंबित झाले आहेत. आयुर्वेदात कडूलिंबाच्या वृक्षाला अणन्य साधारण महत्व आहे. या वृक्षाची, साल, फुले, पाने, फळे (लिंबोळ्या) पानाच्या काड्या यापासून अनेक उपपदार्थ बनविले जाते. त्यामध्ये लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड, कडूनिंब तेल, लिंबोळी खत, भूनंबादी काढा आदी आयुर्वेदिक उपचारासाठी तयार केले जाते. त्वचा रोग, कृमिनाशक, पिकावर फवारणीसाठी आदी अनेक कारणासाठी या वृक्षाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाला निंब वृक्षाचे मोठे फायदे आहेत. हा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदु समाजात चैत्रशुद्ध प्रतिपदेला (गुडी पाडवा) निंबफुले, हरभरा डाळ व गुळ यापासून पातळ पदार्थ बनवून घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायक म्हणून पाजले जाते. ते अनादी कालापासून त्याचे अनुकरण प्रतिवर्षी केले जाते. म्हणूनच या वृक्षास कामधेनू असेही म्हटले जाते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहार येतो असा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. मात्र यंदा येणेगूर परिसरातील आष्टामोड, सुपतगाव, येणेगूर, नळवाडी शिवारातील काही झाडांना नवीन पालवी फुटून फुलांच्या तोरांची गुच्छे बहरल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. देवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा जणूकी बदल नसून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ऋतुचक्र (उन्हाळा, हिवाळा, पावसाळा) सारखे पुढे जात असल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. सतत तीन ते चार वर्ष एखाद्या वृक्षाला वर्षातून दोनदा बहर येत असेल तो जनूकीय बदल असे म्हणता आले असते. मात्र लिंब वृक्ष निलेसी परिसरातील असून, अगादी रिक्टीका इंदिका असे वनस्पती शास्त्रीतील त्याचे नाव आहे. या परिवारातील वृक्षांना वर्षातून एकदाच फुले व फळे येतात असेही डॉ. देवरकर यांनी सांगितले.