शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध काश्मीरात

By admin | Updated: February 14, 2016 00:09 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली. परिणामी, सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध दिल्ली, जम्मू काश्मीरच्या बाजारातही दरवळला आहे. येथून दररोज दोन हजार गुलाब पुष्प बाजारात विक्रीसाठी जात आहेत.१२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सिंधुताई उगिले यांनी एक एकर शेतीवर गुलाबांची लागवड केली. याकामी त्यांचे पती दिलीप उगिले यांचीही त्यांना खंबीर साथ आहे. त्यामुळेच पॉलीहाऊसची ही शेती अत्यंत बहरात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील फुले दिल्ली, जबलपूर, जम्मू काश्मीरच्या बाजारात विक्रीसाठी जात आहेत. २०१३ साली पॉलीहाऊस उभे करून २०१४ मध्ये गुलाबाची लागवड करण्यात आली. वर्षभरानंतर शेती चांगलीच बहरात आली. दररोज दीड ते दोन हजार फुलांचा सुगंध दरवळू लागला. हा सुगंध केवळ लातूरपर्यंत मर्यादित न राहता जम्मू काश्मीरपर्यंत गेल्याने या महिला शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.