शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

नांदेडच्या धावपट्टीवरुन पुन्हा विमानाचे उड्डाण

By admin | Updated: March 20, 2016 01:06 IST

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़ ही बाब एअर इंडियाच्या लक्षात आणून देत, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी नांदेडची विमानसेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत़ दरम्यान, लवकरच कमी प्रवासीक्षमता असलेले विमान नांदेडच्या धावपट्टीवरुन उड्डाण करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे़राज्यातील विमानतळांच्या यादीत नांदेडचे विमानतळ सुसज्ज व सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे़ प्रदीर्घ काळ दिल्ली तसेच मुंबई येथून नांदेडसाठी विमानसेवा सुरु राहिली होती़, परंतु प्रवाशांची अनाठायी अडचण समोर करीत, विमानसेवा बंद करण्यातच यंत्रणेने आपला वेळ खर्ची केला़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून विकसनशील भागांना जोडणारी विमानसेवा सुरु ठेवावी अशी आग्रही मागणी केली़ मागील सत्ताकाळात राज्यामध्ये २० विमानतळे विकसित झाली़ नांदेड येथे शीख बांधवांचे पवित्र स्थळ सचखंड गुरुद्वारा आहे़ जगभरातून शीख बांधव नांदेडला येतात़ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहराला व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विमानसेवेचा मोठा लाभ होवू शकतो़ त्यामुळे किमान एअर इंडियाने तरी, कमी प्रवासी क्षमतेचे विमान राज्यातील महत्वाच्या विमानतळावरुन उड्डाण करेल याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती़ नांदेड येथून यापूर्वी गो एअर आणि किंगफिशर या दोन कंपन्यांची विमाने उड्डाण करीत होती़ सुरुवातीला गो एअर आणि त्यानंतर किंगफिशरने सेवा बंद केली़नांदेड येथून केवळ नांदेडच नव्हे तर परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांनाही हवाई वाहतुकीचा लाभ होणार आहे़ सद्य:स्थितीत औरंगाबाद अथवा हैदराबाद येथूनच सदर सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते़ ज्यामुळे उद्योग व्यवसायासाठी येणारी मोठी शिष्टमंडळे, उच्च तंत्रज्ञानाशी निगडित मनुष्यबळ सहजपणे उपलब्ध होत नाही़ एकूणच या भागाच्या विकासासाठी नांदेडच्या सुसज्ज विमानतळावरुन एअर इंडियाचे कमी क्षमतेचे विमान धावले पाहिजे, अशी आग्रही मागणीही खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली आहे़ या अनुषंगाने एअर इंडियाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेडच्या धावपट्टीवरुन लवकरच विमान उड्डाण करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)