शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

जिल्ह्यातील पाच तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ पेक्षा कमी झाली आहे. यातही पाच तालुक्यांत ॲक्टिव्ह ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ पेक्षा कमी झाली आहे. यातही पाच तालुक्यांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एकेरी आकड्यात आली आहे. या तालुक्यांची कोरोनामुक्तींकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम दौलताबादेत कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या १० महिन्यांत ग्रामीण भागांत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही औरंगाबाद आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये आढळली आहे. त्यातही रुग्णसंख्येत औरंगाबाद तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो. सर्वात कमी रुग्ण हे सोयगाव तालुक्यात आढळले. गेल्या काही दिवसांत निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, गंगापूर, कन्नड हे पाच तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची चिन्हे आहेत. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पाहता याठिकाणी आगामी काही दिवसात एकही रुग्ण राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना ग्राफी

१)पूर्वी बाधित होण्याचे प्रमाण-७.७५ टक्के

२)सध्या बाधित होण्याचे प्रमाण-३.८ टक्के

३)रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-९६.५३ टक्के

४) मृत्युदर-२.६३ टक्के

५)आतापर्यंत झालेल्या चाचण्या- ६९,३५७

तालुक्यानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

तालुका -ॲक्टिव्ह रुग्ण

औरंगाबाद-१२

फुलंब्री-६

गंगापूर-७

कन्नड-९

खुलताबाद-४

सिल्लोड-१०

वैजापूर-१४

पैठण-१२

सोयगाव-१

--

बरे झालेले रुग्ण-४४, ७११

उपचार घेणारे रुग्ण-३८४

मृत्यू-१२२१

---

लवकरच कोरोनामुक्त तालुके

फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव,गंगापूर, कन्नड हे पाच तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची चिन्हे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके म्हणाले, ग्रामीण भागात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या फार कमी आहे. शिवाय रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे लवकरच सर्व तालुके कोरोनामुक्त होतील, अशी आशा आहे.