शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २११ लघु, मध्यम प्रकल्पात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, शेतीमशागीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २११ लघु, मध्यम प्रकल्पात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, शेतीमशागीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे़ तर ग्रामीण भागातील टंचाईसदृश्य गावांसाठी ६५ टँकर सुरू असून, १९५ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागलेल्या जिल्हावासियांना गतवर्षी गणोशोत्सव कालावधीत झालेल्या पावसाने काही अंशी दिलासा दिला़ कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही़ तर उजनी पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने उस्मानाबादकरांनाही यंदा टंचाई जाणवली नाही़ उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या रबीचे मोठे नुकसान झाले़ वादळी वाऱ्यासह बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळेही शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही मोठा फटका सहन करावा लागला़ मान्सून वेळेत दाखल होईल, असा हवामान खात्याने प्रारंभी अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली होती़ मात्र, नंतर केरळातच अडखळत अडखळत मान्सून दाखल झाला आहे़ वातावरणातील बदलानंतर मान्सून जिल्ह्यात कधी येईल याचा अंदाज नाही़ मशागतीची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागले आहे़ ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ६५ टँकर सुरू करण्यात आले असून, १९५ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर मेडसिंगासह इतर गावात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल उन्मळून पडल्याने पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी होत आहे़सद्यस्थिीत जिल्ह्यातील १९३ लघू प्रकल्पात ४४़०९५ दलघमी पाणीसाठा असून, यात २०़५८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५़८० आहे़ मध्यम १७ प्रकल्पात ७५़२९१ दलघमी पाणी असून, यातील ३१़४४५ दलघमी म्हणजे ४़९६ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे़ एकूण २११ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४़९६ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत ही जवळपास चार टक्क्यांनी अधीक आहे़ (प्रतिनिधी)काही प्रकल्पातील स्थितीउस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा प्रकल्पात ७़१ टक्के, रूईभर प्रकल्पात १३़६ टक्के, तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात ११़४६ टक्के, हरणी प्रकल्पात ७़८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर कळंब तालुक्यातील रायगव्हाण, उमरगा तालुक्यातील तुरोरी, भूममधील संगमेश्वर, तर परंडा तालुक्यातील खासापुरी, चांणी, खंडेश्वर, साकत या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नसून, जोत्याखाली पाणीपातळी आहे़गतवर्षी जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि उस्मानाबाद या तालुक्यामध्ये पावसाने सरासरी गाठली. मात्र भूम, परंडा, वाशी आणि कळंब या चार तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यामध्ये असणारे प्रमुख प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच विहीर, बोअर यासारख्या जलस्त्रोतांची पाणी पातळीही फारशी न उंचावल्यामुळे जलस्त्रोत कोरडे पडण्यास सुरुवात झाली. परिणामी अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या विविध गावांत ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.