शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

साडेसहाशे विद्युत खांब उन्मळून पडले !

By admin | Updated: June 6, 2016 00:23 IST

उस्मानाबाद : तीन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद : तीन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील मिळून सुमारे साडेसहाशेवर विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. रविवारी दिवसभर ठिकठिकाणचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.जिल्हा भीषण दुष्काळाचे चटके सोसत असतानाच मागील तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामध्ये शेकडो घरांची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच विजा पडून बऱ्याचप्रमाणात जनावरेही दगावली आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका वीज कंपनीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे चक्क लोखंडी विद्युत खांब वाकले आहेत. सिमेंटचे खांब तर अक्षरश: मोडून पडले आहेत. यामध्ये मोठ्या लाईनचे सुमारे १९० तर लहान लाईनचे ४५० पेक्षा अधिक खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. दरम्यान, रविवारी सकाळपासून वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही हाती घेतली. ही कार्यवाही कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी जवळपास सहा ‘एजन्सीज’ला जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. तसेच वीज कंपनीचे नियमित कर्मचारीही कार्यरत आहेत. सायंकाळपर्यंत अनेक गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.३६ तासानंतर वीजपुरवठा सुरळीतउस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर परिसरात अनेक ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी तासभर वीजपुरवठा झाला. त्यानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा रविवारी सकाळी पूर्ववत झाला.वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या विद्युत वाहिनीचे १९० तर लहान वाहिनीचे साडेचारशेवर विद्युतखांब कोसळले आहेत. दुरूस्तीचे काम लागलीच हाती घेण्यात आले आहे. रविवारी दिवसभर काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता गुप्ता यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरातील रामनगरसह अन्य भागातील वीजपुरवठा शनिवारी रात्री बंद झाला होता. तो रविवारी दुपारनंतर सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले.