शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

साडेसहाशे विद्युत खांब उन्मळून पडले !

By admin | Updated: June 6, 2016 00:23 IST

उस्मानाबाद : तीन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद : तीन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील मिळून सुमारे साडेसहाशेवर विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. रविवारी दिवसभर ठिकठिकाणचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.जिल्हा भीषण दुष्काळाचे चटके सोसत असतानाच मागील तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामध्ये शेकडो घरांची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच विजा पडून बऱ्याचप्रमाणात जनावरेही दगावली आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका वीज कंपनीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे चक्क लोखंडी विद्युत खांब वाकले आहेत. सिमेंटचे खांब तर अक्षरश: मोडून पडले आहेत. यामध्ये मोठ्या लाईनचे सुमारे १९० तर लहान लाईनचे ४५० पेक्षा अधिक खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. दरम्यान, रविवारी सकाळपासून वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही हाती घेतली. ही कार्यवाही कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी जवळपास सहा ‘एजन्सीज’ला जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. तसेच वीज कंपनीचे नियमित कर्मचारीही कार्यरत आहेत. सायंकाळपर्यंत अनेक गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.३६ तासानंतर वीजपुरवठा सुरळीतउस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर परिसरात अनेक ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी तासभर वीजपुरवठा झाला. त्यानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा रविवारी सकाळी पूर्ववत झाला.वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या विद्युत वाहिनीचे १९० तर लहान वाहिनीचे साडेचारशेवर विद्युतखांब कोसळले आहेत. दुरूस्तीचे काम लागलीच हाती घेण्यात आले आहे. रविवारी दिवसभर काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता गुप्ता यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरातील रामनगरसह अन्य भागातील वीजपुरवठा शनिवारी रात्री बंद झाला होता. तो रविवारी दुपारनंतर सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले.