शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

By admin | Updated: November 25, 2015 23:24 IST

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे.

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. आत्महत्या रोखण्याासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने समाधान व्यक्त होत आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बीडचा आकडाही पावने तिनशेच्याजवळ जावून पोहचला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून मत्स्य व्यवसायासंदर्भात योजनांची अंमलबजावणी करता यावी, यासाठी ८ एप्रिल २०१५ ला मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली आणि ३० जुलै २०१५ ला योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा बीडमध्ये लाभ घेण्यास सुरूवात झाली असून, मत्स्यबीजासाठी १४ अर्ज आले असून ९ अर्ज फिरते वाहन देण्यात यावे, यासाठी आले आहेत.१०० टक्के अनुदानकृषी विभागाने बांधुन दिलेल्या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमुदही करण्यात आलेले आहे. तसेच एका तलावात एक हजार मत्स्य बोटुकली आणि एक हजार कोळंबी बीज संचयन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)