शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

जालन्यात पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:48 IST

सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या साहित्याद्वारे व्यापक विचार मंथन व्हावे या उद्देशाने सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी येथील शगुन मंगल कार्यालयात होणाºया या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत सहभागी होणार आहेत.संमेलनाचे राज्य निमंत्रक राजीव देशपांडे, सुभाष थोरात, संयोजन समितीचे सचिव आण्णा सावंत, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदे संमेलनाची भूमिका व कार्यक्रमांची रुपरेषा याबाबत माहिती दिली.१० सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता नरसय्या आडाम यांच्या उपस्थितीत लोकशाही आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ सन्मान मिरवणूक काढण्यात येणार आहे. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. आ.ह. साळुंखे यांच्यासह अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, कादंबरीकार दिनानाथ मनोहर, लेखक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्य स्थिती या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. जयदेव डोळे, सईद अहेमद यांच्यासह गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्म संगिनी यांचा सहभाग असेल.सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान आकडा, आम्ही दोघं, परिवर्तनाचा जलसा हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री साडेआठ वाजता साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. ११ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये कादंबरीकार कुमान अनिल, सीटूचे प्रा. सुभाष जाधव, अमृत मेश्राम, लेखक रवींद्र चावरेकर, शिल्पा कांबळे, प्रभू राजगडकर, श्रीधर पवार, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. अक्रम पठाण हे विचार मांडणार आहेत.साडेअकरा ते दीड दरम्यान होणाºया तिसºया सत्रात ग्रामीण कष्टकरी आणि कला-साहित्य या विषावर समीक्षक डॉ. मनोहर जाधव, उद्धव भवलकर, सदानंद देशमुख, डॉ. के.जी.एनपुरे, डॉ. माधव गादेकर, राजाभाऊ भैलुमे, आनंद विंगकर सहभागी होणार आहेत. समारोप सत्रात श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावर विचारमंथन होणार आहे.