शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जालन्यात पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:48 IST

सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या साहित्याद्वारे व्यापक विचार मंथन व्हावे या उद्देशाने सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी येथील शगुन मंगल कार्यालयात होणाºया या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत सहभागी होणार आहेत.संमेलनाचे राज्य निमंत्रक राजीव देशपांडे, सुभाष थोरात, संयोजन समितीचे सचिव आण्णा सावंत, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदे संमेलनाची भूमिका व कार्यक्रमांची रुपरेषा याबाबत माहिती दिली.१० सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता नरसय्या आडाम यांच्या उपस्थितीत लोकशाही आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ सन्मान मिरवणूक काढण्यात येणार आहे. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. आ.ह. साळुंखे यांच्यासह अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, कादंबरीकार दिनानाथ मनोहर, लेखक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्य स्थिती या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. जयदेव डोळे, सईद अहेमद यांच्यासह गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्म संगिनी यांचा सहभाग असेल.सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान आकडा, आम्ही दोघं, परिवर्तनाचा जलसा हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री साडेआठ वाजता साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. ११ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये कादंबरीकार कुमान अनिल, सीटूचे प्रा. सुभाष जाधव, अमृत मेश्राम, लेखक रवींद्र चावरेकर, शिल्पा कांबळे, प्रभू राजगडकर, श्रीधर पवार, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. अक्रम पठाण हे विचार मांडणार आहेत.साडेअकरा ते दीड दरम्यान होणाºया तिसºया सत्रात ग्रामीण कष्टकरी आणि कला-साहित्य या विषावर समीक्षक डॉ. मनोहर जाधव, उद्धव भवलकर, सदानंद देशमुख, डॉ. के.जी.एनपुरे, डॉ. माधव गादेकर, राजाभाऊ भैलुमे, आनंद विंगकर सहभागी होणार आहेत. समारोप सत्रात श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावर विचारमंथन होणार आहे.