शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

पहिला दिवस निरंक...!

By admin | Updated: January 28, 2017 00:44 IST

उस्मानाबाद : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांकडून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. इच्छुकांना १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागासाठी निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे एकेका जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असलेल्याने त्यांच्या मुलखती घेण्यात येत असून जवळपास सर्वच पक्षांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. परंतु, बंडखोरीचा संभाव्य धोका ओळखून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, २७ जानेवारीपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यातून एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्जदाखल केलेला नाही. १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. संभाव्य अपीलावर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येईल. अपील न झाल्यास ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आणि अपील झाल्यास अर्ज मागे घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल. त्याचप्रमाणे १० फेब्रुवारी रोजीच मतदार केद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येईल. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. (प्रतिनिधी)