शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

पहिला दिवस निरंक...!

By admin | Updated: January 28, 2017 00:44 IST

उस्मानाबाद : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांकडून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. इच्छुकांना १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागासाठी निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे एकेका जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असलेल्याने त्यांच्या मुलखती घेण्यात येत असून जवळपास सर्वच पक्षांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. परंतु, बंडखोरीचा संभाव्य धोका ओळखून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, २७ जानेवारीपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यातून एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्जदाखल केलेला नाही. १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. संभाव्य अपीलावर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येईल. अपील न झाल्यास ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आणि अपील झाल्यास अर्ज मागे घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल. त्याचप्रमाणे १० फेब्रुवारी रोजीच मतदार केद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येईल. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. (प्रतिनिधी)