शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

राज्यातील पहिले प्रमाणपत्रमुक्त गाव

By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST

औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा बन हे संपूर्ण गावच प्रमाणपत्रमुक्त केले.

करमाड : जात, रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रीमिलेअर अशा विविध प्रमाणपत्रांसाठी तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारण्याची आता अख्ख्या गावात कुणालाच गरज नाही. प्रशासनाने पुढाकार घेतला अन् औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा बन हे संपूर्ण गावच प्रमाणपत्रमुक्त केले. प्रशासनाने विशेष कार्यक्रम घेऊन तब्बल ७५० प्रमाणपत्रांचे वाटप केले असून महाराष्ट्रातील हे पहिले प्रमाणपत्रमुक्त गाव बनले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील आणि मंडळाधिकारी यांच्या कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी झाली आहे. शेंद्रा बन येथे बुधवारी झालेल्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. कल्याण काळे हे होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विक्रमकुमार, उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात, तहसीलदार विजय राऊत, पं. स. सभापती सरसाबाई वाघ, फुलंब्रीचे सभापती संदीप बोरसे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. काळे यांनी सांगितले, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शेंद्रा बन गावातील कोणीच प्रमाणपत्रापासून वंचित राहिलेले नाही. केवळ चकरा माराव्या लागतात म्हणून अनेकांनी प्रमाणपत्र काढण्याचेच सोडून दिले होते; मात्र आता ही वेळ येथील कुणावरच येणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाधिकारी सतीश तुपे यांनी, तर सूत्रसंचालन मनोज चव्हाण यांनी केले. आभार सरपंच संजय पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षण सहसंचालक भाऊसाहेब तुपे, पं. स. सदस्य गजानन मते, सुनील हरणे, रामूकाका शेळके, सुधीर मुळे, पुंडलिकराव अंभोरे, आत्माराम पळसकर, जनार्दन तुपे, तलाठी के. डी. तुपे, एस. डब्ल्यू. वाघ, तलाठी बिरारे, ग्रामसेवक विलास कचकरे, कृष्णा नेमाने, अशोक काळे, संजय पळसकर यांची उपस्थिती होती.१०० गावे प्रमाणपत्रमुक्त करणारजिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मार्च २०१५ पर्यंत जिल्ह्यातील १०० गावे प्रमाणपत्रमुक्त करण्याचा संकल्प सोडला. तसेच शेंद्रा बन हे गाव प्रमाणपत्रमुक्त केल्याबद्दल महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. प्रत्येक विभागाने जास्तीत-जास्त गावे प्रमाणपत्रमुक्त करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.