शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

अखेर अतिक्रमणावर ग्रामपंचायतचा हातोडा

By admin | Updated: May 24, 2014 00:54 IST

शिरूरकासार: शहरात अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले होते. यामुळे रहदारीस अडथळा येत होतो. शिवाय गेल्या काही दिवसात शहरात येणारी बसही येईनाशी झाली होती.

शिरूरकासार: शहरात अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले होते. यामुळे रहदारीस अडथळा येत होतो. शिवाय गेल्या काही दिवसात शहरात येणारी बसही येईनाशी झाली होती. यामुळे ग्रामपंचायतने ठराव घेऊन शुक्रवारी अतिक्रमणावर हातोडा चालविला. येथील पोलीस स्टेशन ते बाजार तळापर्यंतच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमणे दिवसेंदिवस रस्त्यावर पुढे-पुढे येऊ लागल्याने शहरात येणारी बसही बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परिणामी प्रवाशांना पायी चालत बसपर्यंत ये-जा करावी लागत होती. येथील बसस्थानक शहरापासून दूर अंतरावर आहे. यामुळे रात्रीच्यावेळी बसस्थानकापासून शहरात प्रवाशांना पायी चालत यावे लागत असे. याचा महिला, वृद्ध यांना मोठा त्रास होत होता. अतिक्रमण दूर केल्याशिवाय बस शहरात येणार नाही, ही बाब ग्रामसभेत समोर आली होती. यावेळी अतिक्रमण हटविण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला होता. यानंतर स्वत:हून अतिक्रमण हटविण्यास ग्रामस्थांना मुदतही देण्यात आली होती. यासंदर्भात ग्रामस्थांनी नोटीसही दिली होती. यानंतर काही नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले. मात्र, काही नागरिकांनी ग्रामपंचायतच्या नोटिसीला न जुमानता अतिक्रमण तसेच ठेवले. ज्यांनी अतिक्रमण काढले नाही, त्यांच्या अतिक्रमणावर ग्रामपंचायतने शुक्रवारी बुलडोजर चालविला. ग्रामपंचायतने अनेकांची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची आठवण काढली. अतिक्रमण काढताना ग्रामविकास अधिकारी मधुकर चोपडे, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यास काहींचा विरोध होता. यावर त्यांना अतिक्रमण हटविणे व्यावसायिकदृष्ट्या कसे महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेणार असल्याचेही चोपडे म्हणाले. (वार्ताहर)