शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

...अखेर अधिग्रहणाचे २ कोटी मिळाले

By admin | Updated: July 27, 2015 01:10 IST

उस्मानाबाद : टंचाई निवारणार्थ टँकरसोबतच शेतकऱ्यांच्या जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. परंतु, त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद : टंचाई निवारणार्थ टँकरसोबतच शेतकऱ्यांच्या जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. परंतु, त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होत आहे. मार्च २०१५ पूर्वीचे पैसे आजपावेतो मिळालेले नव्हते. हा प्रश्न पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या तातडीच्या आढावा बैठकीतही चर्चिला गेला होता. त्यावर हा निधी उपब्ध करून देवू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मार्चअखेरपर्यंतचे २ कोटी २ लाख ५८ हजार रुपये उपलब्ध झाले असून वाटपही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. गतवर्षी तर ऐन हिवाळ्यातच काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मार्चपूर्वी तब्बल पावणेतीनशे जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांची तहान भागविली जात होती. संबंधित शेतकऱ्यांना अधिग्रहणाचा मोबदला तातडीने मिळने अपेक्षित असते. परंतु, येथे घडले उलट. मार्च २०१५ अखेरपर्यंतचे संबंधित शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी २ लाख रुपये देणे आवश्यक होते. परंतु, ते मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठकांमध्येही हा विषय चर्चेला आला होता. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दुष्काळ निवारणार्थ करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीतही आ. मधुकरराव चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अधिग्रहणाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दुसरे स्त्रोत अधिग्रहित करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी याबाबत लवकरच तोडगा काढून अधिग्रहणाचे पैसे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तीन-चार दिवसांपूर्वी मार्च २०१५ पूर्वीचे २ कोटी २ लाख ५८ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत. त्याचे वाटपही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)