शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी लग्न मोडल्याने तरुणासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:04 IST

औरंगाबाद : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरल्यामुळे वधूकडील मंडळींनी लग्नाची सर्व तयारी केली, पत्रिका वाटप केल्या, असे असताना नवरदेवासह त्याच्या ...

औरंगाबाद : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरल्यामुळे वधूकडील मंडळींनी लग्नाची सर्व तयारी केली, पत्रिका वाटप केल्या, असे असताना नवरदेवासह त्याच्या नातेवाइकांनी तुमची मुलगी पसंत नाही, एक लाख रुपये दिले तरच लग्न होईल, असे सांगून लग्न मोडल्याचा प्रकार जयभवानीनगर येथे घडला. वधूपित्याने विनवणी केल्यानंतरही आरोपींनी त्यांना न जुमानता शिवीगाळ करीत धमकावले. याप्रकरणी वधूपित्याने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात तरुणासह त्याच्या नातेवाइकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. नवरदेव सागर बाबूराव कोंगळे, त्याचे वडील बाबूराव कोंगळे, त्याची आई आणि दोन बहिणींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी एकाच वसाहतीत राहतात. तक्रारदार यांच्या मुलीसाठी स्थळ शोधत होते. आरोपी सागर हा इंजिनिअर असून तो खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या वडिलांनी तक्रारदार यांची भेट घेऊन सागरसाठी त्यांच्या मुलीला मागणी घातली. स्थळ आवडल्याने चार पाहुणे बोलावून लग्नाची बोलणी झाली. तेव्हा लग्न खर्चासाठी ८० हजार रुपये रोख, लग्नात कपडे, भांडे आणि जेवणाची व्यवस्था करून मंगल कार्यालयात लग्न लावून देण्याची मागणी नवरदेवाकडील मंडळींनी केली. २९ नोव्हेंबर २०२० रोजी दोन्हींकडील नातेवाइकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. यावेळी तक्रारदार यांनी नवरदेवाला ३८ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी आणि कपडे दिले. यावेळी १६ एप्रिल २०२१ ही लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्नाचा खर्च म्हणून २३ मे रोजी नातेवाइकांसमक्ष ५० हजार रोख देण्यात आले. उर्वरित ३० हजार लग्नाच्या आठ दिवस अगोदर देण्याचे कबूल केले होते. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने लग्नाची तारीख ७ जून रोजी, अशी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे तक्रारदार यांनी लग्नाच्या तयारीसाठी नवरदेव मुलाचे कपडे खरेदीसाठी खर्च केला. लग्नात देण्यासाठी संसारोपयोगी भांडी, कपाट खरेदी केले. दरम्यान, २० मे रोजी तरुणीच्या वाढदिवसासाठी सागर आणि त्याचे नातेवाईक तक्रारदार यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी तुमची मुलगी पसंत नाही, तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी आणखी एक लाख रुपये दिले तरच हे लग्न होईल, असे सांगितले. तक्रारदार यांनी लग्न न मोडण्यासाठी त्यांना विनंती केली. मात्र, आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. एवढेच नव्हे तर दिलेली रक्कमही परत करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिल्याने तक्रारदार यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.