शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पंधरा शाळांची मान्यता धोक्यात

By admin | Updated: July 6, 2016 00:21 IST

औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे.

औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे. नुकतेच आरटीई कायद्यानुसार राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे शाळांचा हा उद्योग समोर आला. जिल्ह्यात अशा १५ शाळा असून नियमाप्रमाणे त्या सर्व शाळांची मान्यता रद्द होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वच शासन मान्य शाळांना बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला शाळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यावेळी काही शाळांनी मूळ मान्यता असलेल्या ठिकाणचा पत्ता नोंद केला होता. त्यानंतर २५ टक्के मोफत जागांवर विद्यार्थ्यांचे नंबर लागले. प्रवेश घेण्यासाठी पालक संबंधित पत्त्यावर गेले तेव्हा परिसरातून शाळाच गायब होत्या. अनेक पालकांनी नमूद पत्त्यावर शाळा सापडत नसल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे यासंबंधीच्या तक्रारींचा ओघ वाढत राहिला. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळून पाहिली असता सदरील शाळांनी सुरुवातीला एका ठिकाणची शासनाची मान्यता घेताना; परंतु विद्यार्थी संख्या अपुरी पडू लागल्यामुळे त्या शाळांनी परस्पर दुसऱ्याच ठिकाणी शाळा सुरू केली. मात्र, आरटीई प्रवेशप्रक्रियेवेळी त्या शाळांनी आॅनलाईन नोंदणी करताना मूळ पत्ता नमूद केलेला होता. प्रत्यक्षात शाळांचे स्थलांतर करताना शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, या शाळांनी परस्पर दुसऱ्या परिसरात स्थलांतर केले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेमुळे अशा शाळांचे पितळ उघडे पडले. ज्या शाळा स्थलांतर करण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय ज्या शाळा परस्पर स्थलांतर करतात, त्यांची मान्यता शासन निर्णयानुसार आपोआप रद्द होते. यासंबंधी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. परस्पर स्थलांतर केलेल्या शाळांमध्ये अनेक नामांकित संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.