शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष वर्गात बसण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : गेली आठ महिने केवळ ऑनलाईन ओळख, चाैथ्या वर्गातून पाचवीत गेल्यावर पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गात ...

औरंगाबाद : गेली आठ महिने केवळ ऑनलाईन ओळख, चाैथ्या वर्गातून पाचवीत गेल्यावर पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गात जाण्यापासून ते शेजारच्या बाकावर बसण्यासाठी एकच लगबग दिसून आली. मित्रांच्या भेटीत गुंग पाचवीचे विद्यार्थी, प्रत्यक्ष वर्गात बसल्यावर पहिल्यांदाच हजेरी झाली. फळ्यावर शिक्षकांनी शिकवले, याची मजा काही औरच असल्याचे सांगत ऑनलाईनला कंटाळल्याचे विद्यार्थी म्हणाले.

सोमवारी शहरातील ६९१ शाळांत पाचवीचे वर्ग भरले. प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांना संमतीपत्र घेऊन आत सोडले जात होते. थर्मल गन, ऑक्सिमीटरने तपासणी, हातावर सॅनिटायझरचा फवारा मारुन मास्क न काढण्याची ताकीद शिक्षकांकडून दिली जात होती; तर विद्यार्थ्यांना कधी वर्गात जातो आणि बाकावर बसतो, याची घाई झाली होती. विद्यार्थी आत जाईपर्यंत पालक ओरडून मास्क आणि सॅनिटायझरसह काळजी घेण्याचे सल्ले पाल्यांना देत होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेत आल्याचा आनंद दिसून येत होता. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आतापर्यंत जिल्ह्यात सुरू झाले असून, अद्याप पहिली ते चाैथीचे वर्ग ऑनलाईनच सुरू आहेत.

मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले, शहरातील पाचवीचे सर्व वर्ग सोमवारी सुरू झाले. कोणत्याही शाळेत वर्ग सुरू झाले नाहीत, अशी सायंकाळपर्यंत तरी माहिती आली नाही. सरासरी पन्नास टक्के उपस्थिती होती. पालकांच्या संमतीचे प्रमाण वाढून विद्यार्थी संख्याही हळूहळू वाढेल. शाळा प्रशासनांना शासननिर्देशानुसार कोरोनासंदर्भातील प्रतिबंधक उपाययोजनांची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शहरात पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार १८५ आहे. मात्र, निश्चित उपस्थिती अद्याप कळू शकलेली नाही.