शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांपासून अर्ध्या शहरात निर्जळी

By admin | Updated: August 27, 2015 00:04 IST

उस्मानाबाद : उजनी योजना कार्यान्वीत झाल्यानंतर टंचाईच्या जोखडातून कायमची मुक्तता होईल, असे बोलले जात होते. मात्र, आजही शहराला सहा ते आठ

उस्मानाबाद : उजनी योजना कार्यान्वीत झाल्यानंतर टंचाईच्या जोखडातून कायमची मुक्तता होईल, असे बोलले जात होते. मात्र, आजही शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला होत आहे. असे असतानाच आठवडभरापूर्वी हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या पंपहाऊसमधील विद्युत मोटारीचे शॉप्ट निकामी झाल्याने अर्ध्याअधिक शहरामध्ये निर्जळी आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांना टंचाईला तोंड द्यावे लागत असे. शहरातील बहुतांश कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. तर काही कुपनलिका अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढू लागली आहे. असे असतानाच आठवडाभरापूर्वी हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या पंपहाऊसमधील विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड आला आहे. पंपाचे शॉप्ट गंजले आहे. त्यामुळे उजनी योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याचा फटका जवळपास अर्ध्याअधिक शहराला बसत आहे. काही ठिकाणी पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. तर काही भागात आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. ज्या भागाचा पाणीपुरवठा कुपनलिकांवर अवलंबून आहे, त्या भागात पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यल्प आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, नगर परिषदेकडून सदरील विद्युतपंप दुरूस्तीसाठी नगर येथे पाठविण्यात आला आहे. असे असले तरी दुरूस्तीला आणखी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. विद्युतपंप बसविल्यानंतर पाणी फिल्टरमध्ये पडण्यास एक दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर कुठे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. म्हणजेच शहराला उजनीचे पाणी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. असे असतानाही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले. शहरातील किती कुपनलिका बंद आहेत?, उजीने याजनेच्या पंपामध्ये कोणत्या स्वरूपाचा बिघाड आला? यासह आदी बाबींची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांकडे नव्हती. त्यामुळे प्रशासन पाणीपुरवठ्याबाबत कती गंभीर आहे? हेच यातून समोर येते. भोंग्याचा आवाजही दबला !अनेक भागात पंधरा दिवस लोटले तरी पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. पूर्वी ठरलेल्या दिवशी पाणीपुरवठा होणार नसेल तर भोंगा लावून तसे कळविले जात होते. परंतु, यावेळी अनेक भागामध्ये पालिकेचा भोंगा फिरलेला नाही. त्यामुळे अशा भागातील नागरिक नगर परिषदेत जावून पाण्याबाबत विचारणा करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. टंचाईत ‘प्रभारी’राजनगर परिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा हे रजेवर आहेत. त्यामुळे या पदाचा कार्यभार नायबतहसीलदार जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच मकरंद राजेनिंबाळकर यांचे नगराध्यक्षपद अपात्र ठरल्याने तेही कार्यालयात येत नाहीत. पालिका प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने महत्वाच्या या दोन्ही पदावर कायमस्वरूपी व्यक्ती नसल्याने टंचाई निवारणार्थ अपेक्षित नियोजन होत नसल्याचे बालले जात आहे.मारवाडगल्ली, सांजावेस, मुख्य रस्ता, नेहरू चौक, गवळी गल्ली, निंबाळकर गल्ली, समतानगर आदी भागात मागील आठ ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ ओढावली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. तशी मागणीही होत आहे. परंतु, याबाबत प्रशासनाकडून पाऊले उचलली जात नसल्याचे सांगण्यात येते.