शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मराठवाड्यातील पंधराशे वाहक पुन्हा येणार सेवेत

By admin | Updated: April 18, 2016 01:30 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील १,५२१ वाहकांना संधी मिळणार असून, काही शर्तींवर त्यांना परत सेवेत घेतले जाणार आहे. परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेने राज्यभरातील निलंबित वाहकांना दिलासा मिळाला आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अपहाराच्या आरोपानंतर ११,९८४ वाहकांना एस. टी. महामंडळाने निलंबित केले आहे. २००५ पासूनची ही प्रकरणे असून, एस. टी. महामंडळाच्या स्तरावर कार्यवाहीधीन आहेत. या प्रकरणांमध्ये ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची ७,७९० प्रकरणे प्रलंबित आहेत. तर शिक्षा करण्यात आलेल्या वाहकांची २,८७३ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाने त्यामधील १,१२० प्रकरणांत शिक्षेस स्थगिती दिलेली आहे.वाहकांच्या अपहारप्रकरणी एस. टी. महामंडळातर्फे शिक्षा देण्यात आल्यानंतर या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध संंबंधित वाहकांकडून कामगार न्यायालयात अथवा औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यात येते. त्यामुळे अशा वाहकांच्या न्यायालयीन प्रकरणात एस. टी. महामंडळास न्यायालयीन प्रक्रियेतील तसेच वकिलांच्या सेवामूल्यांपोटी आर्थिक भार सोसावा लागतो. शिवाय वाहकाच्या निलंबनापोटी द्यावयाच्या आर्थिक प्रयोजनामुळेही महामंडळास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच बराचसा कालावधीही त्यात जातो.अपहार प्रकरणांमध्ये वाहकाचा न्यायालयीन प्रकरणी होणारा खर्च, कालापव्यय, मानसिक ताण कमी होण्यासाठी, तसेच या सगळ्यांमुळे कुटुंबियांना होणारा मानसिक, आर्थिक त्रास विचारात घेऊन वाहकांची अपहार प्रकरणे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटी व शर्तीकाही अटी व शर्र्तींवर ही प्रकरणे निकाली काढण्याचा राज्य परिवहन संचालक मंडळातर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे. कार्यवाहीधीन ११,९८४ वाहकांना अपहारप्रकरणी महामंडळातर्फे सहानुभूतीपूर्वक विचार करून कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत पुनर्नेमणूक देण्यात येईल. त्यासाठी राज्य परिवहन संचालक मंडळासमोर प्रस्ताव सादर करून महामंडळाच्या संचालक मंडळातर्फे वाहकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यात मराठवाड्यातील १,५२१ वाहकांचा समावेश राहणार आहे.परिपत्रकानंतर अंमलबजावणीसद्य:स्थितीत विभागामध्ये वाहकांची संख्या अपुरी आहे. निलंबित वाहकांना पुन्हा सेवेत घेण्यासंदर्भात परिपत्रक येणे अपेक्षित आहे. परिपत्रक प्राप्त होताच त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.- एस. एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ