शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसाठी भाविकांचा राज्यभरातून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:05 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्रातील भाविक आपला नंबर लागावा म्हणून जोरदार प्रयत्न करीत असतात. दरवर्षी ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्रातील भाविक आपला नंबर लागावा म्हणून जोरदार प्रयत्न करीत असतात. दरवर्षी राज्यभरातून हज कमिटीकडे किमान ४० हजार अर्ज येतात. यंदा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख १० जानेवारी देण्यात आली होती. मागील एक महिन्यात फक्त ६ हजार ५०० अर्ज आले आहेत. यातील किमान दोन हजार यात्रेकरू यंदा जाऊ शकतील, अशी शक्यता हज कमिटीतील सूत्रांनी व्यक्त केली.

मुस्लिम बांधवांना आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रा करणे बंधनकारक आहे. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यासाठी हा नियम लागू होत नाही. हज कमिटीमार्फत हज यात्रेला जाण्यासाठी दरवर्षी भाविक अर्ज दाखल करून प्रयत्न करीत असतात. दोन ते तीन वर्षे सतत अर्ज भरल्यानंतर अनेक भाविकांचा नंबर लागतो. मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे सौदी अरेबिया सरकारने भाविकांना बोलावले नाही. यंदा सौदी अरेबिया सरकारने कडक नियमांचे पालन करीत हज यात्रा घेण्याचे निश्चित केले आहे. मागील महिला हज कमिटीमार्फत इच्छुक भाविकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. औरंगाबाद शहरातून पूर्वी दरवर्षी किमान तीन ते चार हजार अर्ज दाखल होत असत. यंदा हे प्रमाण अवघ्या पाचशेपर्यंत आले आहे. जिल्ह्यातून फक्त सातशे अर्ज प्राप्त आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याची स्थितीही समाधानकारक नाही. राज्यभरातून पूर्वी ४० हजार अर्ज येत होते. यंदा हे प्रमाण अवघ्या ६ हजार ५०० पर्यंत आले आहे. रविववारी सायंकाळपर्यंत आणखी पाचशे अर्ज वाढण्याची शक्यता आहे.

अर्ज संख्या का खालावली ?

हज यात्रेचे दिवस कमी केले आहेत. हज यात्रेनंतर परत आल्यानंतर भाविकांना तीन ते सात दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. हज यात्रेचा खर्च जवळपास चार लाखांपर्यंत पोहोचला आहे. हज यात्रेदरम्यान भाविकांना खर्च करण्यासाठी पूर्वी २१०० रियाल रक्कम देण्यात येत होती. ती आता १५०० करण्यात आली आहे. ठरावीक वयोमर्यादा असलेल्या भाविकांना यात्रेची परवानगी राहील.

कोरोना, खर्च आदींमुळे परिणाम

कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक अवस्थाही खालावली आहे. पूर्वीच्या तुलनेत खर्च अफाट वाढला आहे. कोरोना संसर्गामुळे भाविक आजही घाबरत आहेत. अनेक कारणांमुळे यंदा हज यात्रेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. मकसूद अहमद खान, सीईओ हज कमिटी महाराष्ट्र.