शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

८१५ ग्रा.पं.मध्ये महिला ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:52 IST

केवळ महिलांच्या प्रश्नांवरच १ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८६२ पैकी ८१५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांच्या ग्रामसभा घेतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केवळ महिलांच्या प्रश्नांवरच १ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८६२ पैकी ८१५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांच्या ग्रामसभा घेतल्या. उर्वरित ४७ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक हे पुणे येथे आयोजित राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी गेल्यामुळे त्याठिकाणी ग्रामसभा झाल्यानाहीत.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शासनाच्या निर्णयानंतर विभागातील आठही जि.प.च्या मुख्याध्यापकांना १ आॅक्टोबर रोजी खास महिलांसाठी आणि २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नियमित ग्रामसभा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी तात्काळ एका परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना महिलांसाठी ग्रामसभेच्या आयोजनाबाबत कळविले. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित राहून अहवाल घेण्यासाठी व ‘मी गर्भलिंग निदान करणार नाही आणि ते होऊ देणार नाही’ अशी महिलांना शपथ देण्यासाठी तेथे संपर्क अधिकारीही नेमले.प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातील निधीतून अथवा आपल्या उत्पन्नातील १० टक्के निधी महिलांना स्वयंरोजगारासाठी खर्च करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत महिलांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देणे, बचत गटांसाठी मदत करणे आदी विषयांवर या ग्रामसभेत निर्णय घेण्यातआले.ग्रामसभांना गावातील ज्या महिला उपस्थित असतील, त्यांनाच विविध स्वयंरोजगारासाठी निधी अथवा अन्य योजनांचा लाभ द्यावा. अनुपस्थित महिलांना लाभ देऊ नये. ज्यामुळे ग्रामसभांना यापुढे महिलांची उपस्थिती राहील, अशा सूचनाही जिल्हा परिषदेने दिल्या होत्या. जिल्ह्यात महिलांच्या ग्रामसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली.