शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कृतज्ञतेचा भाव जोपासून समाजासाठी कार्य करावे

By admin | Updated: September 21, 2016 00:18 IST

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत.

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत. शाळेला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. शाळेतील आपले बांधव, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. शाळेतून आपल्याला जे मिळाले आहे, ते पुढे अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, यासाठी प्रयत्न करा. समाजासाठी कार्य करा, अशा भावनिक शब्दात शाळेचे पहिले प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले.शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेतर्फे मंगळवारी शासकीय विद्यानिकेतन शाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर, माजी खासदार उल्हास पाटील, माजी प्राचार्य दि.रा. गोगटे, जळगाव मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, प्राचार्या अरुणा भूमकर, अविनाश दबडगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी वि. वि. चिपळूणकर म्हणाले, शाळेला ५० वर्षांपूर्वी जो निधी मिळत होता, तेवढाच आज मिळतो. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा प्रश्न आहे; पण आज हा सोहळा पाहतोय की, शाळेचे प्रॉडक्ट असलेल्या विद्यार्थ्यांची मने कणखर झाली आहेत. हे आमचे फलित आहे. खा. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, शासकीय विद्यानिकेतनच्या संकल्पनेचे बीज समोर ठेवून नवोदय विद्यालयाची योजना मांडण्यात आली. देशभरात ती उभी राहिली. ज्या एका बिजापासून नवीन वृक्ष तयार झाले, त्या मूळ बिजाची मात्र निगा राखली नाही. आ. केळकर यांनी मार्गदर्शनात शाळेला वेगळा दर्जा देण्याची मागणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, सचिव मच्छिंद्र चाटे, कोषाध्यक्ष दुष्यंत आठवले, मानसिंग पाटील, डॉ.राजेंद्र बोहरा, गोपीचंद चाटे, यमाजी मालकर आदींची उपस्थिती होती. संचालन राहुल भोसले यांनी केले.