शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

कृतज्ञतेचा भाव जोपासून समाजासाठी कार्य करावे

By admin | Updated: September 21, 2016 00:18 IST

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत.

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत. शाळेला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. शाळेतील आपले बांधव, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. शाळेतून आपल्याला जे मिळाले आहे, ते पुढे अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, यासाठी प्रयत्न करा. समाजासाठी कार्य करा, अशा भावनिक शब्दात शाळेचे पहिले प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले.शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेतर्फे मंगळवारी शासकीय विद्यानिकेतन शाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर, माजी खासदार उल्हास पाटील, माजी प्राचार्य दि.रा. गोगटे, जळगाव मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, प्राचार्या अरुणा भूमकर, अविनाश दबडगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी वि. वि. चिपळूणकर म्हणाले, शाळेला ५० वर्षांपूर्वी जो निधी मिळत होता, तेवढाच आज मिळतो. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा प्रश्न आहे; पण आज हा सोहळा पाहतोय की, शाळेचे प्रॉडक्ट असलेल्या विद्यार्थ्यांची मने कणखर झाली आहेत. हे आमचे फलित आहे. खा. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, शासकीय विद्यानिकेतनच्या संकल्पनेचे बीज समोर ठेवून नवोदय विद्यालयाची योजना मांडण्यात आली. देशभरात ती उभी राहिली. ज्या एका बिजापासून नवीन वृक्ष तयार झाले, त्या मूळ बिजाची मात्र निगा राखली नाही. आ. केळकर यांनी मार्गदर्शनात शाळेला वेगळा दर्जा देण्याची मागणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, सचिव मच्छिंद्र चाटे, कोषाध्यक्ष दुष्यंत आठवले, मानसिंग पाटील, डॉ.राजेंद्र बोहरा, गोपीचंद चाटे, यमाजी मालकर आदींची उपस्थिती होती. संचालन राहुल भोसले यांनी केले.