शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञतेचा भाव जोपासून समाजासाठी कार्य करावे

By admin | Updated: September 21, 2016 00:18 IST

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत.

औरंगाबाद : शासकीय विद्यानिकेतनच्या रूपाने ५० वर्षांपूर्वी जे रोपटे लावले, त्याची फळे आज पाहता आली. आज शाळेची अवस्था वाईट आहे; परंतु कोणापुढे हात पसरायचे नाहीत. शाळेला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. शाळेतील आपले बांधव, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. शाळेतून आपल्याला जे मिळाले आहे, ते पुढे अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, यासाठी प्रयत्न करा. समाजासाठी कार्य करा, अशा भावनिक शब्दात शाळेचे पहिले प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले.शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेतर्फे मंगळवारी शासकीय विद्यानिकेतन शाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर, माजी खासदार उल्हास पाटील, माजी प्राचार्य दि.रा. गोगटे, जळगाव मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, प्राचार्या अरुणा भूमकर, अविनाश दबडगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी वि. वि. चिपळूणकर म्हणाले, शाळेला ५० वर्षांपूर्वी जो निधी मिळत होता, तेवढाच आज मिळतो. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा प्रश्न आहे; पण आज हा सोहळा पाहतोय की, शाळेचे प्रॉडक्ट असलेल्या विद्यार्थ्यांची मने कणखर झाली आहेत. हे आमचे फलित आहे. खा. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, शासकीय विद्यानिकेतनच्या संकल्पनेचे बीज समोर ठेवून नवोदय विद्यालयाची योजना मांडण्यात आली. देशभरात ती उभी राहिली. ज्या एका बिजापासून नवीन वृक्ष तयार झाले, त्या मूळ बिजाची मात्र निगा राखली नाही. आ. केळकर यांनी मार्गदर्शनात शाळेला वेगळा दर्जा देण्याची मागणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, सचिव मच्छिंद्र चाटे, कोषाध्यक्ष दुष्यंत आठवले, मानसिंग पाटील, डॉ.राजेंद्र बोहरा, गोपीचंद चाटे, यमाजी मालकर आदींची उपस्थिती होती. संचालन राहुल भोसले यांनी केले.