शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

भोई समाजाचे तहसीलसमोर उपोषण

By admin | Updated: May 20, 2014 01:08 IST

माजलगाव: सहायक निबंधक व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी हे भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या चेअरमन यांना पाठीशी घालत असल्याने

माजलगाव: सहायक निबंधक व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी हे भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या चेअरमन यांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी भोई समाजाने सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ बोगस असल्याचा आरोप भोई समाजाने केला आहे. ३० आॅगस्ट २००८ रोजी तत्कालीन सहायक निबंधक कांबळे यांनी ३ सभासदांची प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली होती व या संस्थेचे बोगस चेअरमन व संचालक मंडळ यांना बरखास्त केले होते. तरी सहायक निबंधक बोराडे यांच्या कूटनीतीच्या धोरणामुळे बोगस चेअरमन व संचालक मंडळ आजही संस्थेचा कारभार भ्रष्ट मार्गाने चालवत आहेत. सदरील संस्थेच्या बोगस चेअरमनला जिल्हा मत्स्य विकास अधिकारी पवार हे कोणत्या आधारे मत्स्य ठेके व शासकीय अनुदान देतात असा प्रश्न यावेळी उपोषणात सहभागी झालेल्या भोई समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सहायक निबंधक बोराडे व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी पवार हे बोगसरीत्या माजलगाव धरणाचा ठेका घेऊन मासेमारी करतात. यामुळे २ हजारांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या भोई समाजावर अन्याय होत आहे. रॉयल्टीच्या नावाखाली लूट करुन कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सहायक निबंधक, जिल्हा मत्स्य विकास अधिकारी व माणिक शहा मत्स्य व्यवसाय संस्थेचे चेअरमन यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात भोई समाजाने केली आहे. दोन हजार कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न माजलगाव तालुक्यात १० ते १२ हजारपेक्षा जास्त भोई समाजाची संख्या आहे. भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हा आहे. मात्र शासनाने मासेमारीचा ठेका देत असताना भोई समाजाला डावलून दुसर्‍याच संस्थेला दिला आहे. कुठल्याही धरणाचा मासेमारीचा ठेका देत असताना संबंधित संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांना मासेमारी आली पाहिजे, हे निकष आहेत. मात्र ज्यांनी हा ठेका घेतला आहे त्या संस्थेतील बहुतांश जणांना जाळे देखील टाकता येत नाही, अशी स्थिती आहे, असा आरोप शेख निसार पटेल, रमेश साळवे, प्रल्हाद गायकवाड यांनी केला आहे. उपोषणात भोई समाजाच्या कार्यकत्यांचा समावेश होता. यावेळी आव्हान संघटनेचे अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी सांगितले की, जर भोई समाजाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सतत उपोषण, आंदोलने करू. शासनाच्या कीचकट धोरणामुळे दोन हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे माजलगाव येथील भोई समाजाच्या आंदोलनात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (वार्ताहर)