शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शेतकऱ्यांना चिंता आता पीकविम्याची!

By | Updated: December 2, 2020 04:10 IST

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक ...

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक भागांत पैसेवारी जास्तीची दाखविल्यामुळे पीकविमा मिळेल की नाही, अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

यावर्षी वरुणराजाचे आगमन वेळेवर म्हणजे मृगनक्षत्रात झाल्याने शेतकरी खुशीत होते. मृगनक्षत्रात झालेली पेरणी लाभदायक ठरते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी खर्चाचे गणितही मांडून ठेवले. मात्र, वरुणराजाने तालुक्यावर इतकी कृपादृष्टी केली की, वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दीडपट पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग, उडीद वाया गेले. सोयाबीन काळे पडले, तर मक्यावर पडलेल्या लष्करी अळीपाठोपाठ कणसांची लांबी कमी झाली. काढणी केलेली मक्याची कणसेही अतिपावसामुळे शेतातील पाण्यात तरंगली. कपाशीच्या कैऱ्या सडल्या. तालुक्यातील २७ हजार ३०० शेतकऱ्यांच्या १६ हजार ९८६ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या पंचनाम्यांवरून या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या तर उर्वरित कैऱ्यांमध्ये बोंडअळीने गनिमी काव्याने हल्ला केला. चौफेर संकटांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. मात्र, नुकसानभरपाईतून वगळले गेले असलो तरी पीकविमा मिळेल या आशेवर शेतकरी होता; पण तालुक्यातील प्रत्येक गावांची सुधारित पैसेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. करंजखेडा, चिंचोली आणि नाचनवेल या महसूल मंडळांची सुधारित पैसेवारी ५२ ते ५३ आहे, तर उर्वरित मंडळांची सरासरी ६६ दाखविण्यात आली आहे. यामुळे पीकविमा मिळण्यासाठी पैसेवारी ५० पेक्षा कमी लावण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. अर्थात अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर केली जाते.

चौकट

पैसेवारीसंदर्भात हर्षवर्धन जाधवांची आज बैठक

पैसेवारी ५० पेक्षा कमी लावावी याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी दुपारी १२ वा शिक्षक पतसंस्थेच्या हॉलमध्ये शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान आ. उदयसिंग राजपूत यांनी २४ नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेऊन सुधारित पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र, शेतकऱ्यांनी रबीची तयारी सुरू केल्याने आता पंचनामे कशाचे करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.