शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंता आता पीकविम्याची!

By | Updated: December 2, 2020 04:10 IST

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक ...

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक भागांत पैसेवारी जास्तीची दाखविल्यामुळे पीकविमा मिळेल की नाही, अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

यावर्षी वरुणराजाचे आगमन वेळेवर म्हणजे मृगनक्षत्रात झाल्याने शेतकरी खुशीत होते. मृगनक्षत्रात झालेली पेरणी लाभदायक ठरते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी खर्चाचे गणितही मांडून ठेवले. मात्र, वरुणराजाने तालुक्यावर इतकी कृपादृष्टी केली की, वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दीडपट पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग, उडीद वाया गेले. सोयाबीन काळे पडले, तर मक्यावर पडलेल्या लष्करी अळीपाठोपाठ कणसांची लांबी कमी झाली. काढणी केलेली मक्याची कणसेही अतिपावसामुळे शेतातील पाण्यात तरंगली. कपाशीच्या कैऱ्या सडल्या. तालुक्यातील २७ हजार ३०० शेतकऱ्यांच्या १६ हजार ९८६ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या पंचनाम्यांवरून या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या तर उर्वरित कैऱ्यांमध्ये बोंडअळीने गनिमी काव्याने हल्ला केला. चौफेर संकटांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. मात्र, नुकसानभरपाईतून वगळले गेले असलो तरी पीकविमा मिळेल या आशेवर शेतकरी होता; पण तालुक्यातील प्रत्येक गावांची सुधारित पैसेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. करंजखेडा, चिंचोली आणि नाचनवेल या महसूल मंडळांची सुधारित पैसेवारी ५२ ते ५३ आहे, तर उर्वरित मंडळांची सरासरी ६६ दाखविण्यात आली आहे. यामुळे पीकविमा मिळण्यासाठी पैसेवारी ५० पेक्षा कमी लावण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. अर्थात अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर केली जाते.

चौकट

पैसेवारीसंदर्भात हर्षवर्धन जाधवांची आज बैठक

पैसेवारी ५० पेक्षा कमी लावावी याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी दुपारी १२ वा शिक्षक पतसंस्थेच्या हॉलमध्ये शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान आ. उदयसिंग राजपूत यांनी २४ नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेऊन सुधारित पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र, शेतकऱ्यांनी रबीची तयारी सुरू केल्याने आता पंचनामे कशाचे करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.