शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंता आता पीकविम्याची!

By | Updated: December 2, 2020 04:10 IST

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक ...

कन्नड : गेल्या वर्षभरापासून संकटांशी धैर्याने सामना देणाऱ्या शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला आहे. अतिपावसाने नुकसान झालेले असतानाही अनेक भागांत पैसेवारी जास्तीची दाखविल्यामुळे पीकविमा मिळेल की नाही, अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

यावर्षी वरुणराजाचे आगमन वेळेवर म्हणजे मृगनक्षत्रात झाल्याने शेतकरी खुशीत होते. मृगनक्षत्रात झालेली पेरणी लाभदायक ठरते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी खर्चाचे गणितही मांडून ठेवले. मात्र, वरुणराजाने तालुक्यावर इतकी कृपादृष्टी केली की, वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या दीडपट पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग, उडीद वाया गेले. सोयाबीन काळे पडले, तर मक्यावर पडलेल्या लष्करी अळीपाठोपाठ कणसांची लांबी कमी झाली. काढणी केलेली मक्याची कणसेही अतिपावसामुळे शेतातील पाण्यात तरंगली. कपाशीच्या कैऱ्या सडल्या. तालुक्यातील २७ हजार ३०० शेतकऱ्यांच्या १६ हजार ९८६ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या पंचनाम्यांवरून या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या सडल्या तर उर्वरित कैऱ्यांमध्ये बोंडअळीने गनिमी काव्याने हल्ला केला. चौफेर संकटांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. मात्र, नुकसानभरपाईतून वगळले गेले असलो तरी पीकविमा मिळेल या आशेवर शेतकरी होता; पण तालुक्यातील प्रत्येक गावांची सुधारित पैसेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. करंजखेडा, चिंचोली आणि नाचनवेल या महसूल मंडळांची सुधारित पैसेवारी ५२ ते ५३ आहे, तर उर्वरित मंडळांची सरासरी ६६ दाखविण्यात आली आहे. यामुळे पीकविमा मिळण्यासाठी पैसेवारी ५० पेक्षा कमी लावण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. अर्थात अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर केली जाते.

चौकट

पैसेवारीसंदर्भात हर्षवर्धन जाधवांची आज बैठक

पैसेवारी ५० पेक्षा कमी लावावी याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी दुपारी १२ वा शिक्षक पतसंस्थेच्या हॉलमध्ये शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान आ. उदयसिंग राजपूत यांनी २४ नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेऊन सुधारित पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र, शेतकऱ्यांनी रबीची तयारी सुरू केल्याने आता पंचनामे कशाचे करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.