शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

शेती उपयोगी अवजारे सिल्लोड पंचायत समितीत धूळखात पडून

By admin | Updated: June 30, 2014 01:04 IST

राजू वैष्णव , सिल्लोड शासनाकडून पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सबसिडीवर शेती उपयोगी अवजारे दिली जातात

राजू वैष्णव , सिल्लोडशासनाकडून पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सबसिडीवर शेती उपयोगी अवजारे दिली जातात; पण या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याने शेती उपयोगी अवजारे दोन वर्षांपासून गोडाऊनमध्ये धूळ खात पडून आहेत. शासनाक डून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची ग्रामीण भागात जनजागृती केली जात नसल्याने शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात; पण प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या योजनांची माहिती दिली जात नाही. यामुळे शासनांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून पंचायत समिती कार्यालयामार्फत चार बैली नांगर, लोखंडी वखर, सारायंत्र, दोन चाडी तिफण, क ीटकनाशक फवारणीचे स्प्रे पंप आदींसह मिरचीवर फवारणीसाठी एन्डोसल्फान, सल्फर, कार्बेनडॅझिम, कीटकनाशके औषधी ५० टक्के सबसिडीवर दिली जाते; परंतु शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या माहितीपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याने सलग दोन वर्षांपासून शेती उपयोगी अवजारे गोडाऊनमध्ये धूळ खात पडून आहेत. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित असून शेती उपयोगी अवजारे अधिक पैसे खर्च करून शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागतात. गेल्या वर्षी जनजागृतीअभावी शेती अवजारे पडून असल्याने पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे होते; परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. जनजागृतीसाठी पुढाकार घेणारतालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा माहिती तक्ता लावला जाईल. सर्व ग्रामसेवकांना शासकीय योजनांची गावपातळीवर जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे गटविकास अधिकारी मनोज चौधर यांनी सांगितले. कृषी विभागाचे दुर्लक्ष पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती गावपातळीवर देण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकांची आहे. यामुळे पंचायत समिती व नागरिक यांच्यामधील ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा आहे. पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी सबसिडी तत्त्वावर अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती ग्रामसेवकांना दिली जाते; पण ग्रामसेवक या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत नसल्याने लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे.