शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे यंदा पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षी पीक विमा काढण्यासाठी जेवढी रक्कम ...

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे यंदा पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षी पीक विमा काढण्यासाठी जेवढी रक्कम भरली तेवढी देखील न मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

बाजारसावंगी व परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कापूस, मका, तूर, मूग, उडीद या खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी ठरावीक रक्कम भरून विमा काढला. बाजारसावंगी येथील दरेगाव, पाडळी, शेखपूरवाडी, झरी वडगाव, रेल इंदापूर, बोडखा, लोणी कनकशिळ, सुलतापूर, वडोद, येसगाव, जानेफळ, ममुराबादवाडी, शेलगाव, शिरोडी, डोंगरगाव या गावांतील शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा पीक विमा काढला होता; परंतु गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कापूस, तूर, मका, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा तरी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु शेतकऱ्यांच्या हाती विम्याची भरलेली रक्कम देखील भेटली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

----

गेल्या वर्षी मी कापूस, मका, तूर व सोयाबीन या खरीप पिकांचा विमा काढला होता. अतिवृष्टीसह इतर कारणांमुळे माझ्या सर्व पिकांचे नुकसान झाले. केवळ कपाशी पिकाचा अल्प रक्कम देऊन कंपनीने बोळवण केली. त्यामुळ‌े पीक विमा भरून देखील मदत होत नसेल तर पीक विमा भरायचा तरी कशाला, असे शेतकरी भिक्कनराव घुले यांनी सांगितले.

---

यंदा विमा भरण्यासाठी १५ जुलै ही शेवटची तारीख आहे. तरी देखील शेतकरी पीक विमा भरण्याकडे वळाले नाही. यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा न भरलेलाच बरा, अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे, असे सीएससी सेंटर चालक राजू शहा यांनी सांगितले.