शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

केळगाव परिसरातील शेतकरी बोंडअळीने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक ...

केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक शेतकरी कपाशी मोडून तिला जाळून टाकीत आहेत. या विदारक परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रवर्षीप्रमाणे यंदाही कपाशीवर बोंडअळीचे संकट उभे राहिले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या हाती केवळ चाळीस टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे, सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील गणेश ईवरे यांनी तीन एकरातील कपाशी पिक चिमट्याच्या सहाय्याने मोडून टाकले. आजवर योग्य व्यवस्थापन करीत त्यांनी पीक जोपासले कपाशीवर चार ते पाच वेळा फवारणी केली प्रत्येक कपाशीच्या बोंडात अळी असल्याने उत्पादन येण्याची चिन्हे दिसून आली. कापूस वेचणीला खर्चही वाढलेला आहे. उत्पादन अत्यंत कमी दिसत असल्याने चिमट्याच्या व ट्रक्टर चालवत आहेत पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.

पाहणी करून मदत करावी

सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने कापसाला चांगलाच फटका बसला आहे. तरीही कापसाकडून चांगल्या उत्पादनाची आस लागलेल्या शेतकर्‍यांना बोंडअळीमुळे निराशा पसरली आहे. ओलीत क्षेत्रात एकरी दहा ते बारा क्विंटल कापूस पिकत असे. तिथे केवळ तीन ते चार क्विंटल कापूस शेतकर्यांच्या हाती लागला. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणे कठीण झाला आहे. काही ठिकाणी शेतात कापसाचे पीक अद्यापही आहेत, मात्र तिथे बोंडअळ‌ीने उद्रेक केला आहे. अखेर निराशाजनक परिस्थिती पाहता शेतकरी कपाशी मोडून त्याला पेटवून देत आहेत. बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पाहणी करून शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

फोटो - चिमट्याच्या सहाय्याने कपाशी उपटून टाकताना शेतकरी बांधव