शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शेतकऱ्यांची माहिती आता ‘कृषिमित्र वेबपोर्टल’वर

By admin | Updated: August 27, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : जिल्हाभरात किती शेतकरी आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी व संलग्न योजनांचा लाभ घेतला की नाही. त्यांच्यासाठी कोणत्या योजना देता येतील

उस्मानाबाद : जिल्हाभरात किती शेतकरी आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी व संलग्न योजनांचा लाभ घेतला की नाही. त्यांच्यासाठी कोणत्या योजना देता येतील, आदी बाबींची एकत्रित माहिती संकलीत करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. हा सर्व ‘डाटाबेस’ माहिती आता ‘कृषी मित्र वेबपोर्टल’ वर टाकण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांसोबतच विविध शासकीय यंत्रणेना होणार आहे. विविध शासकीय योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी, या योजनेचा लाभ घेऊन त्याने उन्नती साधावी, गटशेतीच्या माध्यमातून प्रगतीची कास धरावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी गटनिर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद आणि भूम या दोन तालुक्यामध्ये शेतकरी गटांची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर अन्य तालुक्यामध्ये कार्यवाही सुरु केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वेळेवर कर्जपुरवठा करणे, गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा वेळेवर पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणीपासून ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री, पीक संरक्षणाची व्यवस्था, ग्रेडींग, पॅकींग आणि बाजारपेठेची माहिती देणे हा या गटशेतीमागचा उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने गटशेती उपक्रमात आघाडी घेतली असून, जिल्हाभरात २० हजार ५०० गट स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)