शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘अन्न सुरक्षे’तून शेतकऱ्यांना धान्य

By admin | Updated: August 18, 2015 00:44 IST

लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांनाही अल्प दरात गहू व तांदळाचे वितरण सुरु करण्यात आले असून,

लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांनाही अल्प दरात गहू व तांदळाचे वितरण सुरु करण्यात आले असून, ३३५ गहू तर २२२ मेट्रीक टन तांदळाचे वितरण लातूर जिल्ह्यात करण्यात आले आहे़ ९४ हजार ६६२ शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्य दुकानांमार्फत तांदूळ, गहू दिला जात आहे़ स्वातंत्र्यदिनापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे़ गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे़ या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मराठवाड्यात ८ आणि विदर्भातील ६ अशा एकूण १४ जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना धान्य देण्यास प्रारंभ केला आहे़ दारिद्र्यरेषेवरील केसरी शिधापत्रिका लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराबरोबरच धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ लातूर जिल्ह्यात ९४ हजार ६६२ श्ेतकरी आहेत़ त्यांच्याकडे हेच कार्ड आहे़ त्यानुसार ३ रुपये किलो तांदूळ आणि २ रुपये किलो दराने गहू प्रतीमहा प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात या योजनेला प्रारंभ झाला असून, शासनाकडून लातूर जिल्ह्यासाठी ३३५ मेट्रीक टन गहू आणि २२२ मेट्रीक टन तांदूळ प्राप्त झाला असून, त्याचे वितरणही करण्यात आले आहे़ जिल्ह्यात असलेल्या १३८० स्वस्त धान्य दुकानांतून शेतकऱ्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने हा उपक्रम शासनाने सुरू केला असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांची संख्या ९४ हजार ६६२ असून, या शेतकऱ्यांच्या कार्डवर कुटुंबातील सदस्य संख्या ५ लाख ३७ हजार ६४३ आहे़ त्यांंना नियमानुसार ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू दिला जात आहे़ प्रति व्यक्ती ५ किलो या प्रमाणे हे धान्य वाटपाला स्वातंत्र्यदिनापासून प्रारंभ झाला आहे़ प्रातिनिधीक स्वरुपात महापूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले आहे़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, सरपंच सुमन आलोने यांची उपस्थिती होती़ लातूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या १३८० असून, या सर्व दुकानातंर्गत चावडी वाचन करुन लाभार्थ्यांना धान्य वितरण केले जात आहे़ आता नव्याने शेतकऱ्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून, दक्षता समितीच्या सदस्यांसमोर चावडी वाचन केले जाणार आहे़ शिवाय, दर सहा महिन्याला रेशन कार्ड धारकांची पडताळणी करावी. खरे लाभार्थी वंचित राहू नयेत म्हणून रेशन कार्डची पडताळणी आवश्यक आहे. तिही दक्षता समितीच्या सदस्यांसमोर पडताळणी होणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. महेश ढवळे म्हणाले.